एक्स्प्लोर

Raju Shetti : सरकारविरोधात स्वाभिमानी आक्रमक, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Raju Shetti : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच दे दहा हजार शेतकरी सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितेल आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काम करत आहे. त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी-सोलापूर रस्ता भुसंपादन बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्याला ऊसाचा बुडका घेवून वटणीवर आणू असा सज्जड दम शेट्टी यांनी भरलाय. याचबरोबर साखरेचे दर वाढल्याने उसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये द्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. खते आणि पशुखाद्य यांची दरवढ तत्काळ मागे घ्यावी, सक्तीचे वीज कनेक्शन तोडणे बंद करावे, भुमिग्रहण, अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करावा, कर्जाची नियमीत परकफेड करणाऱ्या सेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान मिळावे या मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधीच वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी दौरे करुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता दसरा चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मोर्चाला सुरूवात होणार आहे.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आता दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी राजू शेट्टी हे सक्रिय होते. इतकंच नाही तर ते महाविकास आघाडीचे सूचकही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, भूमी अधिग्रहण कायदा, ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
Iran-Israel conflict: इराणमध्ये तब्बल 10 हजार भारतीय अडकले; इराणचा इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला, 8 जणांचा मृत्यू; बॅलेस्टिक मिसाईल डागल्या
इराणमध्ये तब्बल 10 हजार भारतीय अडकले; इराणचा इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला, 8 जणांचा मृत्यू; बॅलेस्टिक मिसाईल डागल्या
वडील आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कुटुंबासाठी विम्याचं नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या 
वडील आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कुटुंबासाठी विम्याचं नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या
Dhananjay Mahadik on Satej Patil: आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला
आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kopargaon Birthday Murder : कोपरगावमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून अपहरण हत्याTuljapur Temple Controversy : तुळजाभवानीला 'भारत माता' म्हटल्यामुळे पुजारी मंडळांमध्ये वादABP Majha Headlines 3 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सSindhudurg Rain : सिंधुदुर्गात समुद्राला उधाण,किनाऱ्यावर ती तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा ABP MAJHA

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
Iran-Israel conflict: इराणमध्ये तब्बल 10 हजार भारतीय अडकले; इराणचा इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला, 8 जणांचा मृत्यू; बॅलेस्टिक मिसाईल डागल्या
इराणमध्ये तब्बल 10 हजार भारतीय अडकले; इराणचा इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला, 8 जणांचा मृत्यू; बॅलेस्टिक मिसाईल डागल्या
वडील आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कुटुंबासाठी विम्याचं नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या 
वडील आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कुटुंबासाठी विम्याचं नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या
Dhananjay Mahadik on Satej Patil: आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला
आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला
Iran Israel War:  इस्रायलच्या भीतीने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई बंकरमध्ये लपले; कुटुंबालाही सोबत घेतले, घनघोर संघर्ष सुरुच
इस्रायलच्या भीतीने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई बंकरमध्ये लपले; कुटुंबालाही सोबत घेतले, घनघोर संघर्ष सुरुच
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
दिग्दर्शक म्हणाले, तुला सांगितलं की, तू लगेच इथे आली पाहिजेस; फँड्री फेम राजेश्वरी खरातने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
दिग्दर्शक म्हणाले, तुला सांगितलं की, तू लगेच इथे आली पाहिजेस; फँड्री फेम राजेश्वरी खरातने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
Embed widget