एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Raju Shetti : शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचे आवाहन 

वाहनधारकांनी दोन दिवस वाहतूक करायची नाही, असा निर्णय घ्यायचा आहे. त्यातूनही कोणी रस्त्यावर ऊस आणल्यास सविनय पद्धतीने सांगायचं आहे, असे आवाहन स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

Raju Shetti : केंद्र आणि राज्याचे लक्ष वेधण्यासाठी तसेच न परवडणारी ऊसाची शेती फायद्यात येण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी हे लाक्षणिक आंदोलन करण्यात येत आहे. काही ठोस निर्णयांची आवश्यकता आहे. हा सविनय सत्याग्रह आहे. शेतकऱ्यांनी दोन दिवस ऊसाच्या तोडी नाकारायच्या आहेत. वाहनधारकांनी दोन दिवस वाहतूक करायची नाही, असा निर्णय घ्यायचा आहे. त्यातूनही कोणी रस्त्यावर ऊस आणल्यास सविनय पद्धतीने सांगायचं आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

आज आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन होणार आहे. यंदाच्या हंगामातील स्वाभिमानीचे हे पहिलेच आंदोलन आहे. केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी तसेच ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी कारखानदारांनी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. कारखानदारांना याबाबत काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी आवाहन केलं आहे. कारखानदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर स्वाभिमानीची पुढील रणनीती ठरणार आहे. 

ते म्हणाले की, शेतकऱ्यांची अस्वस्थता समजू शकतो, राग समजू शकतो, पण व्यक्त करण्याची ही वेळ नाही. 18 तारखेनंतर मी निश्चितच तुम्हाला कार्यक्रम देणार आहे, त्यावर निश्चितच तुम्ही राग व्यक्त करा. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात एकरकमी FRP चा कायदा मंजूर करावा

ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी (FRP) देण्याऐवजी एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, तसेच, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, कारखानदारांना दोन दिवस कारखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. जर कारखाने बंद ठेवले नाहीत तर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Embed widget