एक्स्प्लोर

Shekhar Gaikwad Exclusive : कसा असणार यंदाचा ऊस गळीत हंगाम? किती होणार साखरेचं उत्पादन? साखर आयुक्तांची सविस्तर माहिती....

यंदाच्या गळीत हंगामाचं नियोजन कसं आणि त्याची पूर्वतयारी काय? तसेच यंदा उसाचं गाळप किती होणार? यासंदर्भातील सविस्तर माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

Sugar Season 2022-23 : येत्या 15 ऑक्टोबरपासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम (Sugar Season) सुरु होणार आहे. यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे. दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामाचं नियोजन कसं आणि त्याची पूर्वतयारी काय? तसेच यंदा उसाचं गाळप किती होणार? यंदा राज्यातील किती साखर कारखाने सुरु होणार? यासंदर्भात एबीपी माझाने साखर आयुक्त शेखर गायकवाड ( Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शेखर गायकवाड नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...

14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र, 138 लाख टन साखरेचं उत्पादन होणार

ऊसाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झाले आहेत. तसेच काही साखर कारखान्यांची छोटी मोठी कामं सुरु आहेत. यावर्षी 14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यावर्षीही ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा साखरेच्या उत्पादन देखील वाढणार आहे. यंदा 1 हजार 443 लाख टन ऊसाचं गाळप होणार आहे. यावर्षी ऊस उत्पादकता ही 95 टन हेक्टरी आहे. तर यंदा 150 लाख टन साखरेचं उत्पादन होणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली. मात्र, यातील 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळं 12 लाख टन साखर कमी उत्पादीत होणार आहे. यंदा साखरेचं उत्पादन हे 138 लाख टन होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

यंदा 200 पेक्षा अधिक साखर कारखाने सुरु होणार

यावर्षीच्या गळीत हंगामात 200 हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. 203 कारखाने यंदा सुरु होणार आहेत. यंदा काही बंद असलेलं कारखानं सुरु होत आहेत. त्यामुळं ऊस लवकर गाळपासाठी मदत होणार असल्याचे गायकवाड म्हणाले. यावरर्षी सरासरी साखर उतारा हा 11.20 टक्के असणार आहे. यावर्षीचा ऊसाचा गाळप हंगाम हा 160 दिवसांचा असणार आहे. मागील वर्षीचा ऊस गाळप हंगाम लांबला होता. मागील वर्षीचा गळीत हंगाम हा 173 दिवस चालला होता. 

यंदा इथेनॉलचे 119 कोटी लिटर उत्दान होणार

यंदा इथेनॉलच्या उत्पादनात देखील मोठी वाढ होणार आहे. यंदा राज्यात 119 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार असल्याची माहिती साखर आयुक्त गायकवाड यांनी दिली. तर पुढच्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 140 कोटी लिटरहून अधिक अथेनॉल निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात इथेनॉ निर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

60 साखर कारखान्याकडे 300 कोटी रुपयांची थकबाकी

गेल्या हंगामात ऊस गाळप केलेल्या 60 साखर कारखान्यांकडे FRP थकीत आहे. जवळपास 300 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची FRP कारखान्यांकडे थकीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत कारखाना सुरु करण्यासाठी परवाना देणार नसल्याचे शेखर गायकवाड यावेळी म्हणाले. पण 15 ऑक्टोबरच्या आत राहिलेल साखर कारखाने थकीत FRP देतील असेही गायकवाड यावेळी म्हणाले. जर FRP दिली नाही तर त्यांना साखर कारखाना सुरु करता येणार नाही, तरीही कारखाना सुरु केला तर प्रति दिन त्या कारखान्याला दंड आकारला जाईल असे गायकवाड यावेळी म्हणाले.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऊस गळीत हंगाम चालणार

यंदाचा ऊस गळीत हंगाम हा मार्चच्या शेवटपर्यंत किंवा फार फार तर एप्रिलच्या पहिल्या आड्यापर्यंत चालेल अशी माहितीही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. मागील वर्षीइतका ऊसाचा गळीत हंगाम यंदा लाबणीवर पडणार नाही. यंदा कारखान्यांची संख्याही वाढली आहे. तसेच दुसरं कारण म्हणजे यंदा खोडवा ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, त्यामुळं ऊसाचं टनेज कमी होणार आहे, त्यामुळं हंगाम जास्त लांबणार नसल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget