एक्स्प्लोर

Marathwada Rain : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात

Marathwada Rain : परतीच्या पावसानं मराठवाड्यातील सोयाबीन (Soyabean) आणि कापूस (cotton) पिकाला मोठा फटका बसला आहे.

Marathwada Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात सापडले आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या परतीच्या पावसानं मराठवाड्यातील सोयाबीन (Soyabean) आणि कापूस (cotton) पिकाला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनचा बेल्ट असलेल्या मराठवाड्यात काढणीला आलेलं सोयाबीन शेतातच सडत आहे. परतीच्या पावसानं सोयाबीनचा चिखल केला आहे. लातूरसह, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

मराठवाड्यातील अनेक भागात सतत परतीचा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील पाच दिवस सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काढणीला आलेले सोयाबीन असेल किंवा फुलशेती आणि भाजीपाला शेती याला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या लागवडीपासून सोयाबीनच्या पाठीमागे काही ना काही संकट येत आहेत. गोगलगायीचा प्रादुर्भाव, विविध रोग आणि अतिवृष्टी अशा तिहेरी फटक्यातून सोयाबीन कसंतरी तगलं होतं. मात्र, परतीच्या पावसानं सोयाबीनचा अक्षरशः चिखल केला आहे.


Marathwada Rain : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात

हिंगोली जिल्ह्यात पावसामुळं पिकांचं नुकसान

परतीच्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत तर अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये तळ्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी सोयाबीन पीक काढणीला यावं आणि त्या सोयाबीनमधून मिळालेल्या पैशातून दिवाळी साजरी करावी, अशी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवा जुळवा असते. परंतू या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.


Marathwada Rain : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन पाण्याखाली 

मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. आष्टीपासून जवळ असलेल्या आष्टी पिंपरी या गावी अचानक झालेल्या पावसानं सगळी उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. एकनाथ भोसले यांचे तीन एकर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे सगळी सोयाबीनची शेती पाण्याखाली गेली आहे. खरंतर आष्टी तालुका हा आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी असा काही पाऊस बरसला की त्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.


Marathwada Rain : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात

मांजरा धरण 95 टक्के

लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब एकच ती म्हणजे मांजरा धरण हे 95 टक्के भरले आहे. मांजरा नदीवरील धरणाच्या पुढील 14 मोठे बॅरेजेस भरले आहेत. मांजरा धरणात पाण्याची आवक सुरुच राहिल्यास धरणाची दारं लवकरच उघडण्यात येतील. यामुळं या चौदा बॅरजेसचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. मांजरा नदीकाठावरील 152 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. मांजरा धरण हे लातूर उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळं मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget