एक्स्प्लोर

शेतीचे भविष्य वाचवण्यासाठी हमीभावाचा कायदाच हवा, हमीभावासाठी लढाई सुरूच राहणार : राकेश टिकैत

शेतीचे भविष्य वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदाच हवा असल्याचे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. हमीभावाच्या कायद्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.

Rakesh Tikait : शेतमालाला असणारा हमीभाव हा शेतकऱ्यांचा कणा आहे. शेतीचे भविष्य वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदाच हवा असल्याचे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. हमीभावाचा कायदा करण्यासाठीची आमची लढाई सुरू असून, पुढेही सुरूच राहणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. केंद्र सरकारन केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले. यामध्ये 700 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. मागील वर्षीचे हे दिवस कधीही विसरणार नसल्याचे टिकैत म्हणाले. 

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले होते. मात्र, या कायद्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता. कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्दच झाले पाहिजेत अशी मागणी शेतकरी करत होते. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तब्बल वर्षभर दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले. यामध्ये 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधापुढे माघार घेत हे कायदे रद्द केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अन्य देखील काही मागण्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप त्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नेमक्या काय आहेत मागण्या

संयुक्त किसान मोर्चाकडून सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एमएसपीबाबत (MSP) हमीभाव कायदा करणे आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांमध्ये वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. या मागण्यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर वर्षभरानंतर संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्यापही सरकारने पूर्ण केले नाही, त्याविरोधात आता संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा 31 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसहीत अन्य राज्यांमध्येही जिल्हा व तहसील स्तरावर हे आंदोलनं केलं जाणार आहे.  31 जानेवारी हा दिवस "विश्वासघात दिवस" म्हणून  साजरा केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Bhagirath Choudhary: केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 
चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Embed widget