एक्स्प्लोर

Anil Ghanwat : शेतकरी पारतंत्र्यातच, हर घर तिरंगा अभियानात शेतकरी सहभागी होणार नाहीत : अनिल घनवट

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, शेतकरी यामध्ये सहभागी होण्यास उत्साही नसल्याचे शेतकरी नेते अनिल घनवट यांनी म्हटलय.

Anil Ghanwat : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga) राबवण्याचे आवाहन केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी शेतकरी मात्र पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळं शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत. आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारतातील शेतकऱ्यांचे शोषण 

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र शासनाने, 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारतातील शेतकऱ्यांचे फक्त शोषणच झाले आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरु आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयाती यासारखी हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भुमी  हक्क संकुचित केले आहेत, अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास सुद्धा बंदी आहे, हे कसले स्वातंत्र्य? असा सवाल घनवट यांनी केला आहे.

न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात शेतकऱ्यांना रस नाही 
 
इंडिया सरकारकडून भारतातील शेतकऱ्यांचे होणाऱ्या शोषनाचा परिणाम लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात गरिबी आहे, बेरोजगारी आहे. देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नसल्याचे अनिल घनवट यांनी म्हटलं आहे. 

भारताच्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान, पण....

अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहे. सालाबादप्रमाणं 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतील. पण 75 वर्ष होऊनही कृषीप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही याची खंत आहे. आजही शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही, जमीन किंवा व्यवसायाच्या विस्तराचे  स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळं हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व सरकारच्या अशा धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवायचे असल्याचे घनवट म्हणाले.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर काही उपाययोजना होण्याची अपेक्षा करता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या भावना महाराष्ट्र शासनाला कळवाव्यात असे आवाहन अनिल घनवट यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Onion Farmer News : आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?
रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी
रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी
राज्यात पुन्हा अवकाळीचा दणका! फळबागांसह कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, खासदार ज्योती वाघमारे बांधावर
राज्यात पुन्हा अवकाळीचा दणका! फळबागांसह कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, खासदार ज्योती वाघमारे बांधावर

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?
Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Embed widget