एक्स्प्लोर

Monsoon 2023: पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पालघरमध्ये पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी

Palghar News: यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत.

Monsoon 2023 Palghar: पालघर जिल्हा विविध भागात विभागलेला असून डोंगरी नागरी आणि सागरी विभागात पसरलेल्या या जिल्ह्यात पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. नेहमी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस हजेरी लावतो. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा उलटून देखील वरूण राजाने दडी मारली आहे. पालघर जिल्ह्यातील भातशेतीचे सरासरी पेरणी क्षेत्र 7664.42 हेक्टर असून यापैकी फक्त 473.13 हेक्टर क्षेत्रात अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. या आठवड्यापर्यंत फक्त 6.17 टक्के पेरणी पालघर जिल्ह्यात झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला बराच उशीर झाल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

जिल्ह्यात 73 हजार क्षेत्र लागवडीखाली आहे. भात पेरणी करताना दहा गुंठ्यामध्ये भाताची रोपे तयार केले जातात. ती तयार झाली की मग त्याच आवणि करून संपूर्ण शेतात ठराविक अंतरावर त्याची आवणी करून शेतातील शंभर टक्के क्षेत्र वापरले जाते 7664.42 हेक्टर क्षेत्र पेरण्याच्या खालचे आहे. त्यापैकी 473.13 हेक्टर क्षेत्रावर अजून पर्यंत पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बोअरवेल असल्यामुळे त्यांनी आपली कामे पूर्ण केली आहे मात्र जिल्ह्यातील बरेच शेतकरी विहिरी बोअरवेल नसल्यामुळे ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात.  पावसाने पाठ फिरवल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अजून पाऊस लांबला तर पेरणी कशी होणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पालघर जिल्ह्यात तीन प्रकारच्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते हळव, गरव आणि निमगरव पद्धतीची लागवड होते. हळव हे 90 ते 110 दिवसाचे असते. वरकर जमीन भुसभुशीत जमीन इथे या प्रकारच्या भाताची लागवड होते. गरव भात पाणथळ जागी होतो तिथे पाणी साठवण असेल अशा ठिकाणी हे भात तयार होतो. ह्या भातास तयार होण्यासाठी 135 ते 140 दिवसाचा कालावधी लागतो. तर निम गरवचा कालावधी हा 115 ते 125 दिवसाचा असतो. हा प्रकार किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये प्रामुख्याने होत असतो.

ज्या ठिकाणी 80 टक्क्यापेक्षा जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवतात. मात्र, यावर्षी पावसाने उशीर केल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती केलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी नांगरणीस सुरुवात करण्यात आली असून काहीजण नांगराने, तर काहीजण ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचे दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी त्याचे क्षेत्र हे फक्त 473 हेक्टर असल्याने लांबलेला पाऊस शेतकऱ्यांना रडवतो की काय अशी स्थिती सध्या दिसत आहे.


तालुका       सरासरी पेरणी क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र   टक्केवारी

पालघर           1532.85.             124.05.             8.12
 वसई               789.12.              36.25.              4.59
डहाणू             1385.81.              22.44.             1.62
तलासरी            938.72.              4.35.               1.53
वाडा               1441.17.             24.00.             1.67
विक्रमगड         716.47.           143.20.            19.99
जव्हार.              658.70.            38.29                5.81
मोखाडा             201.58.           70.10.              34.78


एकूण         7664.42 हेक्टर         473.13 हेक्टर          6.17 टक्के

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, FPI ने मे महिन्यात 33 हजार कोटी काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांचा मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, 33 हजार कोटी काढून घेतले
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Embed widget