एक्स्प्लोर

Monsoon 2023: पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पालघरमध्ये पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी

Palghar News: यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत.

Monsoon 2023 Palghar: पालघर जिल्हा विविध भागात विभागलेला असून डोंगरी नागरी आणि सागरी विभागात पसरलेल्या या जिल्ह्यात पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. नेहमी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस हजेरी लावतो. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा उलटून देखील वरूण राजाने दडी मारली आहे. पालघर जिल्ह्यातील भातशेतीचे सरासरी पेरणी क्षेत्र 7664.42 हेक्टर असून यापैकी फक्त 473.13 हेक्टर क्षेत्रात अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. या आठवड्यापर्यंत फक्त 6.17 टक्के पेरणी पालघर जिल्ह्यात झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला बराच उशीर झाल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

जिल्ह्यात 73 हजार क्षेत्र लागवडीखाली आहे. भात पेरणी करताना दहा गुंठ्यामध्ये भाताची रोपे तयार केले जातात. ती तयार झाली की मग त्याच आवणि करून संपूर्ण शेतात ठराविक अंतरावर त्याची आवणी करून शेतातील शंभर टक्के क्षेत्र वापरले जाते 7664.42 हेक्टर क्षेत्र पेरण्याच्या खालचे आहे. त्यापैकी 473.13 हेक्टर क्षेत्रावर अजून पर्यंत पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बोअरवेल असल्यामुळे त्यांनी आपली कामे पूर्ण केली आहे मात्र जिल्ह्यातील बरेच शेतकरी विहिरी बोअरवेल नसल्यामुळे ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात.  पावसाने पाठ फिरवल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अजून पाऊस लांबला तर पेरणी कशी होणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पालघर जिल्ह्यात तीन प्रकारच्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते हळव, गरव आणि निमगरव पद्धतीची लागवड होते. हळव हे 90 ते 110 दिवसाचे असते. वरकर जमीन भुसभुशीत जमीन इथे या प्रकारच्या भाताची लागवड होते. गरव भात पाणथळ जागी होतो तिथे पाणी साठवण असेल अशा ठिकाणी हे भात तयार होतो. ह्या भातास तयार होण्यासाठी 135 ते 140 दिवसाचा कालावधी लागतो. तर निम गरवचा कालावधी हा 115 ते 125 दिवसाचा असतो. हा प्रकार किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये प्रामुख्याने होत असतो.

ज्या ठिकाणी 80 टक्क्यापेक्षा जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवतात. मात्र, यावर्षी पावसाने उशीर केल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती केलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी नांगरणीस सुरुवात करण्यात आली असून काहीजण नांगराने, तर काहीजण ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचे दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी त्याचे क्षेत्र हे फक्त 473 हेक्टर असल्याने लांबलेला पाऊस शेतकऱ्यांना रडवतो की काय अशी स्थिती सध्या दिसत आहे.


तालुका       सरासरी पेरणी क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र   टक्केवारी

पालघर           1532.85.             124.05.             8.12
 वसई               789.12.              36.25.              4.59
डहाणू             1385.81.              22.44.             1.62
तलासरी            938.72.              4.35.               1.53
वाडा               1441.17.             24.00.             1.67
विक्रमगड         716.47.           143.20.            19.99
जव्हार.              658.70.            38.29                5.81
मोखाडा             201.58.           70.10.              34.78


एकूण         7664.42 हेक्टर         473.13 हेक्टर          6.17 टक्के

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget