एक्स्प्लोर

Nagpur : शेतमाल आणि पशू उत्पादनात मूल्यवर्धन करणे आवश्यकः डॉ. आशिष पातुरकर

प्रशिक्षण ही केवळ सुरुवात असुन शेतकऱ्यांनी तिथेच थांबू नये तर उद्योजक बनावे आणि कृषी विज्ञान केंद्र मार्फत आयोजित विविध शेती उपयोगी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

नागपूर : शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेळी पालन, मत्स्य पालन, कुक्कुट पालन करावे, इतकेच नाहीतर पशू व शेती उत्पादनाचे मूल्यवर्धन करून आपले अर्थार्जन वाढवावे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीला चालना देत 'रोप वाटिका लागवड' आणि 'मधमाशी पालन' सारखे शेतीपूरक व्यवसाय करणे आज काळाची गरज आहे त्याकरिता प्रशिक्षण आवश्यक आहे असे प्रतिपादन मा. कर्नल. प्रा. (डॉ.) आशिश पातुरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी केले.

ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ, पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 'रोप वाटिका लागवड' आणि 'मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, रविंद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर, डॉ. सारीपुत लांडगे, आयोजक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी,  हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, एम.सी. डी. सी. पुणे, डॉ. अश्विनी गायधनी, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) तथा प्रशिक्षण समन्वयक आणि कु. मयुरी ठोंबरे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) तथा प्रशिक्षण समन्वयक कृषी विज्ञान केंद्र हे मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ.अनिल भिकाने यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी प्रशिक्षण घेण्याच्या सकारात्मक मानसिकतेचे कौतुक करत, प्रशिक्षण ही केवळ सुरुवात असुन शेतकऱ्यांनी तिथेच थांबू नये तर उद्योजक बनावे आणि कृषी विज्ञान केंद्र मार्फत आयोजित विविध शेती उपयोगी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असा संदेश दिला. शेतकऱ्यांनी आपल्यातल्या क्षमता जाणून त्यानुसार विविध शेती उपयोगी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी,असा संदेश मिलिंद आकरे यांनी दिला तसेच रविंद्र भोसले, यांनी कृषी विभागा मार्फत उपलब्ध शेती पूरक योजनांचा लाभ घेऊन वैज्ञानिक शेती करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.

प्रशिक्षणामुळे शेती व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत

कृषि विज्ञान केंद्र हे नेहमीच शेतकर्‍यांकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करीत असल्यामुळे शेती व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचते, त्यामुळे या संधींचा शेतकऱ्यांनी लाभ घावा असे प्रतिपादन डॉ. सारीपुत लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत केले तर  हेमंत जगताप यांनी एम सी डी सी मार्फत विविध प्रशिक्षण आयोजित करण्याची हमी प्रशिक्षणार्थींना दिली. सहभागी प्रशिक्षणार्थी शाह यांनी अभिप्रायात शेतकऱ्यांना त्यांचे अर्थार्जन वाढवण्यासाठी विविध शेती उपयोगी प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र मार्फत मिळत असल्यामुळे प्रशिक्षण घेणे किती फायद्याचे आहे हे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ  अश्विनी गायधनी तर आभार मयुरी ठोंबरे यांनी मानले.  'रोप वाटिका लागवड' प्रशिक्षणाला 55 तर 'मधुमक्षिका पालन' प्रशिक्षणाला 40 असे एकूण 95 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गौतम, पूजा वासाडे , राजेश गहलोद आणि राकेश खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात
उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात
नाशिकमध्ये फळांच्या प्रदर्शनाचे आयोजन, कोण ठरणार मिलांज महाराजा पुरस्काराचा मानकरी?
नाशिकमध्ये फळांच्या प्रदर्शनाचे आयोजन, कोण ठरणार मिलांज महाराजा पुरस्काराचा मानकरी?
Satbara Big Changes :  ७/१२ उताऱ्यात होणार मोठा बदल; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Satbara Big Changes :  ७/१२ उताऱ्यात होणार मोठा बदल; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानच्या 22 व्या हप्त्यापासून 'हे' शेतकरी राहणार वंचित, जाणून घ्या सविस्तर माहिती 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानच्या 22 व्या हप्त्यापासून 'हे' शेतकरी राहणार वंचित, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Shivsena vs BJP in BMC | विकासकामांसाठी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
West Indies vs South Africa: तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
Sharad Pawar: शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
Ajit Pawar: मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
India vs Zimbabwe: टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
Shikhar Dhawan: इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
Mumbai Crime News: उंदीर फळे खातात म्हणून चक्क फळांना 'रॅट किलर' औषध; मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोघांना बेड्या; फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु
उंदीर फळे खातात म्हणून चक्क फळांना 'रॅट किलर' औषध; मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोघांना बेड्या; फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु
Rohit Pawar FIR Mumbai Police: तिकडे रोहित पवार राष्ट्रवादीची फौज घेऊन बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, इकडे मुंबई पोलिसांचा FIR बाबत महत्त्वाचा निर्णय
तिकडे रोहित पवार राष्ट्रवादीची फौज घेऊन बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, इकडे मुंबई पोलिसांचा FIR बाबत महत्त्वाचा निर्णय
Embed widget