एक्स्प्लोर

Bhandra : भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव, मजुरीही निघण्याची शक्यता नाही, चार एकरातील पीक शेतकऱ्यानं पेटवलं

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं आपल्या चार एकर शेतातीतल उभं पीक पेटवून दिलं आहे.

Bhandara Agriculture News : यावर्षी राज्याच्या बहुतांशी भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. आता ती पिकं देखील संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं या पिकातून आता मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हतबल झालं आहेत. दरम्यान, हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं आपल्या चार एकर शेतातीतल उभं पीक पेटवून दिलं आहे.

उत्पन्न हाती येण्याची शक्यता नसल्यानं भाताचं पीक दिलं पेटवून

भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इटान इथं हा प्रकार घडला आहे. शेतकरी दादाजी ठाकरे यांनी आपल्या चार एकर शेतात भात पिकाची लागवड केली होती. सुरुवातीला पूर त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यानं त्यांना सुमारे एक लाखांचा खर्च आला होता. त्यानंतर भातपिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानं हाती आलेले पीक वाया गेलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून, चार एकर शेतीतून दहा किलोही तांदूळ पदरात पडण्याची आशा नव्हती. त्यासाठी कापणीसाठी मजुरी द्यायची कोठून? अशा विवंचनेत शेतकरी दादाजी ठाकरे यांनी त्यांच्या शेतातील धान पेटवून दिले आहे.

बीड जिल्ह्यात तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी देखील चिंतेत आहेत. जिल्ह्यामध्ये तुरीचे (Tur) पीक फुलोऱ्यात आलं असतानाच या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक फुलोऱ्यात आलं आहे. या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे पीक अगदी जोमात आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पिकं ऐन फुलोऱ्यात आलेल्या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.

परतीच्या पावसाचा मराठवाड्यासह विदर्भाला मोठा फटका

दरम्यान, सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसानं काही जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. यामुळं देखील शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. यातून देखील काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहे. या पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : मिरचीच्या कीड व्यवस्थापनासाठी युवा शेतकऱ्यानं शोधली भन्नाट आयडिया, शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा नेमकं काय केलं संशोधन?

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget