एक्स्प्लोर

वाढत्या तापमानाचा केळीचा बागांना फटका, विक्रीसाठी तयार फळांना काळे डाग 

Banana Farming Issue : महाराष्ट्रामध्ये जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु हा केळी बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 

Banana Farming Issue :  राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशापेक्षा जास्त तापमान झालं आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहीत. उन्हाचा त्रास हा शेतकरी वर्गाला जरा जास्त होत आहे. आसमानी, सुलतानी त्रास सहन करणारा शेतकरी नेहमीच संकटात सापडलेला दिसून येतो. आता वाढत्या तापमानाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागांना फटका बसताना दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव शेतशिवारातील केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु हा केळी बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. 

गिरगाव भागामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते.  या केळींची विशेष मागणी जास्त असते कारण या केळीचा आकार मोठा आणि वजन जास्त असतो. या केळींना देशभरात मागणी असते. परंतु याच केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. याचं कारण आहे वाढतं तापमान. वाढत्या तापमानामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. तसेच विक्रीसाठी तयार असलेल्या फळांना काळे डाग पडत आहेत. 

गिरगाव येथील शेतकरी सुभाष रायवडे यांनी यांच्या शेतातील 5 एकर शेत जमिनीवर 3 लाख रुपये खर्च करून केळीच्या बागेची लागवड केली. परंतु वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या 20 वर्षात  पहिल्यांदा यावर्षी उन्हाचा तडाखा केळीच्या बागांना बसत आहेत.

उत्पादन चांगल्या पद्धतीचे होईल या अपेक्षेने शेतकरी सुभाष राजवाडे यांनी यांच्या शेतात तीन लाख रुपये खर्च करून केळीच्या बागेची लागवड केली. परंतु या उन्हाच्या तडाख्यात अनेक केळीची झाडे मोडून पडत आहेत.

पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला सुरुवात केली खरी मात्र कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी कडक उन्हाळा यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान होत आहे. असं असताना देखील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने केळी पिकवली तर नंतर त्यांना भाव मिळेलच याचीही गॅरंटी नाही. आपल्याकडे केळी पिकवणारा शेतकरी हा बागायतदार शेतकरी समजला जातो. आता मात्र याच बागायतदार शेतकऱ्यांवर परवडत नाही म्हणून केळीचे झाड शेतीच्या बाहेर टाकण्याची वेळ आली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
ना बैल, ना ट्रॅक्टर! शेतकऱ्याने थेट मुलगा आणि भावाच्या खांद्यावरच दिली तिफन, तर पत्नी व भावजयीने धरला कुळव
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
बँकेत चकरा मारुनही पिक कर्ज मिळालं नाही, पेरणीसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
Embed widget