एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये, कोणत्या विभागात किती मिळणार मदत? 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोणत्या विभागात किती मदत मिळाली याबाबतची माहिती पाहुयात.

Agriculture News : अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान (Heavy loss of crops) झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोणत्या विभागात किती नुकसान झालं आहे? आणि किती मदत मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत

विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत आहे. कधी आस्मानी संकट येतं. तर कधी सुलतानी संकट येत. कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परिणामी हाती आलेली पिकं वाया जातात. यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कोणत्या विभागात किती आर्थिक मदत ?

सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फटका बसला होता. 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. तर नागपूर विभागात 3 लाख 54  हजार 756  शेतखऱ्यांच्या  2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यासाठी सरकारनं 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर झालीय. दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 

नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये 

दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये असे निर्देश देखील राज्य सरकारनं दिले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Heavy Rain : अवघ्या काही तासांच्या पावसाचा सर्वत्र हाहाकार! हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget