एक्स्प्लोर

Agriculture News : आंब्यापेक्षा जांभळं महाग, एक जांभूळ दहा रुपयाला; किलोचा दर चारशे रुपयांवर

Agriculture News : विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे.

Agriculture News : सध्या आंब्याचा (Mango) सीजन सुरु आहे. त्यामुळे आंब्यांना चांगले दर मिळत आहे. पण अशात आंब्यांना जांभळाने (Jambhul Fruit) मागे टाकले आहे. कारण आंब्यापेक्षा जांभळं महाग झाली आहेत. विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे. 

काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयापर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. महत्वाचे म्हणजे एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत. 

यामुळे वाढले दर....

छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधव मंडीत सध्या जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपये मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा जांभळाची आवक कमी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे झाडाला लागलेल्या बारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात जोरदार वारा असल्याने बार गळून पडला होता. त्यामुळे बाजारात जांभळाची आवक कमी झाली आहे. त्यातच गावरान जांभूळ बाजारात येण्यासाठी आणखी एखाद्या आठवड्याचा वेळ आहे. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या जांभळाला चांगले दर मिळत आहे. 

कंपन्यांची मागणी वाढली... 

जांभळाचं उपयोग औषधी उत्पादनासाठी देखील केला जातो. विशेष म्हणजे शुगरसाठी आणि त्याच्या औषधी उत्पादनासाठी जांभळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून जांभूळ फळासाठी मागणी असते. तर अनेक शेतकऱ्यांकडून कंपनी थेट खरेदी करत असल्याने आणि कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी कंपनीलाच विकण्यासाठी प्राधान्य देतात. त्यात स्वतः कंपनी शेतात येऊन माल खरेदी करत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील वाचत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जांभूळ कंपनीत जात असून, बाजारात दिवसेंदिवस त्याची आवक कमी होत आहे. तर आवक कमी झाल्याने दर देखील वाढत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Wardha News : वर्ध्यातील बोगस बियाणे प्रकरणी 10 जणांना अटक, पशुवैद्यकीय डॉक्टरचाही समावेश, सात दिवसांची पोलीस कोठडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget