एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा 12 तास वीज, फडणवीस दिलेलं आश्वासन पूर्ण करणार का? 

शेतकऱ्यांना (Farmers) आम्ही दिवसा 12 तास वीज (electricity) देणार आहोत. पुढच्या वर्षात सगळ्या शेतकऱ्यानं 12 तास दिवसा वीज देणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना (Farmers) आम्ही दिवसा 12 तास वीज (electricity) देणार आहोत. पुढच्या वर्षात सगळ्या शेतकऱ्यानं 12 तास दिवसा वीज देणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना फडणनीसांनी आश्वासन दिले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना दिवसा अर्धी आणि रात्री अर्धा वीज मिळत आहे. शेतकऱ्याला रात्री अपरात्री शेतात जावं लागतं. पण आपलं सरकार शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आपण वीज सोलरवर वीज करत आहोत. त्यामुळं आता 365 दिवस आपण शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले. 

परळीत आल्यानंतर आम्ही दोन नाथांचं दर्शन घेतलं

परळीत आल्यानंतर आम्ही दोन नाथांचं दर्शन घेतलं. एक प्रभू वैधनाथ आणि दुसरे ज्यांच्या उर्जेमुळं आम्ही राजकारणात आहोत त्या गोपीनाथ मुंडे यांचही दर्शन आम्ही घेतल्याचे फडणवीस म्हणाले.  आज धनंजय मुंडे यांनी एक मिरवणूक ठेवली होती. पण ती मिरवणूक झाली असती तर आम्हाला संध्याकाळ पर्यंत व्यासपीठावर पोहोचताच आले नसते असे फडणवीस म्हणाले. कमी पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर्षी आपण शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. एक रुपयात पिक विमा योजना सुरु केली आहे. बीड जिल्ह्यात 18 लाख शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम जमा झाले असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आमच्या सोयाबीन आणि कापसाचा भाव देखील वाढला पाहिजे असे फडणवीस म्हणाले. 

संकटात अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करणार

संकटात अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला धैर्य यावं, त्याच्या शेतमालाला दर मिळावा हा प्रयत्न सरकार करत आहे. सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार लवकरच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक करणार आहे. आमच्या शेतमालाला चांगला दर मिळावा ही आमची मागणी असल्याचे फडणवीस म्हणाले. 

मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी आम्ही एक मोठं पाऊल उचलणार

पुढच्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही एक मोठं पाऊल उचलणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून देखील चांगलं काम झालं आहे. पुढच्या काळातही बीड जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून चांगल काम होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र राहा, आम्ही तुमच्या पाठीशी

आम्ही तिघे एकत्रित आल्यानंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. 
मी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही विनंती करतो की दोघांनीही असेच एकत्र राहावं आम्ही तिघेही तुमच्या सोबत असल्याचे फडणवी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर; मुंडेंनी यापूर्वी दोनदा टाळले होते फडणवीसांसोबतचे व्यासपीठ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Embed widget