एक्स्प्लोर

DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय

DC vs RCB: दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सेवलच्या वादळी अर्धशतकानंतर जोश हेजलवूडने केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला.

DC vs RCB : दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सेवलच्या वादळी अर्धशतकानंतर जोश हेजलवूडने केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला निर्धारित 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 173 धावांपर्यंत मजल मारता आली. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. यासह गुणतालिकेत आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. 

आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. 190 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना मोठी भागिदारी करु दिली नाही. डेविड वॉर्नरचं अर्धशतक आणि पंतच्या 34 धावांचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. तर पंतने 34 धावांच्या खेळीदरम्यान दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. या दोघांचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पृथ्वी शॉ 16, मिचेल मार्श 14, रॉवमन पॉवेल 00, ललीत यादव 1, शार्दुल ठाकूर 17 यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. आरसीबीकडून जोश हेजलवूड याने भेदक गोलंदाजी केली. हेजलवूडने चार षटकात 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय हसरंगाला एक विकेट मिळाली. 

कार्तिकची फटकेबाजी, मॅक्सवेलचं शतक

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज अनुज रावत शून्य धावसंख्येवर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या अप्रितम चेंडूवर अनुज रावत पायचीत झाला. त्यानंतर आरसीबीच्या आजी-माजी कर्णधारांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण फाफ डु प्लेसिस अवघ्या 8 धावांवर बाद झाला. डु प्लेसिसनंतर विराट कोहलीही 12 धावा काढून तंबूत परतला. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुयेश प्रभुदेसाईला दिल्लीविरोधात मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश अवघ्या सहा धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना मॅक्सवेल याने दुसरी बाजू लावून धरली. मॅक्सवेल याने दमदार अर्धशतकी करत संघाची धावसंख्या वाढवली. मॅक्सवेलने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सेवलने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. मॅक्सवेलनं आरसीबीच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीच्या अडचणीत वाढ झाली होती. आरसीबी 150 धावांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण कार्तिक आणि शाबाज यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. दोघांनी मैदानावर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. कार्तिकने मोक्याच्या क्षणी 34 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान कार्तिकने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले. कार्तिकने मुस्तफिजूरच्या एका षटकात 28 धावा वसूल करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. तर शाबाजनेही कार्तिकला उत्तम साथ दिली. शाबाजने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. शाबाज आणि कार्तिक यांनी 52 चेंडूत 97 धावांची नाबाद भागिदारी केली. दोघांच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने 189 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांपुढे आरसीबीच्या दिग्गज फलंदाजांनीही गुडघे टेकले. आघाडीचे सर्वच फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, कार्तिक आणि मॅक्सवेलपुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत भासत होती. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर, खलील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. शार्दुल ठाकूर यांनी सर्वात कमी धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने चार षटकात 27 धावा देत एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget