एक्स्प्लोर
Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान साखळी सामन्यात दोन्ही संघांना Over Rate च्या नव्या नियमाचा फटका
भारताचा कर्णधार रोहित शर्मा असो किंवा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम. आशिया चषकाच्या सुपर फोरमधल्या सामन्यात दोन्ही कर्णधार आपल्या संघाच्या षटकांची गती योग्य राखण्याचा नेटानं प्रयत्न करतील. कारण नव्या नियमानुसार संथ गतीनं षटकं टाकल्यास केवळ आर्थिक दंड ठोठावला जात नाही, तर हाणामारीच्या षटकांत सीमारेषेवरच्या क्षेत्ररक्षकांवरही बंधनं येतात. भारत-पाकिस्तान साखळी सामन्यात दोन्ही संघांना त्याच नव्या नियमाचा फटका बसला. जाणून घेऊयात त्या सामन्यात नेमकं काय घडलं होतं, त्याविषयी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून.
आणखी पाहा























