एक्स्प्लोर
Barvi Dam | ठाणे जिल्ह्याची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली, बदलापूरचं बारवी धरण काठोकाठ भरलं!
गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी हे धरण भरून वाहू लागलं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे ४ ऑगस्ट रोजी या धरणात अवघा ४८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ऑगस्ट महिन्याअखेर हे धरण काठोकाठ भरलं आहे. आज धरण भरल्यानंतर स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसी अधिकाऱ्यांनी या धरणावर जाऊन जलपूजन केलं. यंदा धरण काहीसं उशिरा भरलं असलं, तरी त्यामुळे पाणी जास्त काळ टिकणार असून पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे ठाणे जिल्ह्याला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















