एक्स्प्लोर
Voter Fraud Allegations | राहुल गांधींचे EC वर गंभीर आरोप, CM फडणवीसांचा पलटवार
राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात चाळीस लाख संशयित मतदार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. मतांची चोरी पाच वेगवेगळ्या पद्धतीने झाल्याचे राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा आणि मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता ते दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले. या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे," अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मतांची चोरी महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही झाली नाही, असेही ते म्हणाले. पाच वर्षांपेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार वाढले, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार वाढले आणि पाच वर्षांनंतर मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली, असे मुद्देही त्यांनी मांडले. बिहारच्या निवडणुकांमध्ये पराभव होणार असल्याचा अंदाज आल्याने हे आरोप केले जात असल्याचेही म्हटले आहे. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आपल्या खासदारांसोबत आहेत.
राजकारण
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
आणखी पाहा






















