एक्स्प्लोर
Rane Slams Uddhav | शिवसेना अधोगतीला कोण जबाबदार? राणेंचा मोठा दावा
ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत असतानाच, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनीच छळले आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केले, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. केवळ राज ठाकरेच नव्हे, तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनीही ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडल्याचा दावा नारायण राणेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. 'जो भून से गई व हौद से नहीं आती' असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना 'भाऊबांकी' या नात्याने परत येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरे यांना त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केले होते, याची त्यांना जाणीव नाही, असे राणेंनी म्हटले आहे. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले, पण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत आणले, पण उद्धव ठाकरेंनी ती सत्ता गमावली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मराठी माणसाने आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवले. गेलेले परत मिळविण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, असेही राणेंनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
क्राईम
मुंबई
Advertisement
Advertisement






















