Rajiv Khandekar Poem Marathi Bhasha Din : मराठी भाषादिननिमित्त राजीव खांडेकर यांनी सादर केली कविता
Rajiv Khandekar Poem Marathi Bhasha Din : मराठी भाषादिननिमित्त राजीव खांडेकर यांनी सादर केली कविता
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आता गावोगावी दिवाळी पहाटेचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत दुसरी परंपरा जी अलीकडे सुरू झाली पण जी सगळ्या महाराष्ट्रव्यापी झाली ती पाडव्याच्या दिवशीच्या शोभा यात्रा ज्या महाराष्ट्रभर आता निघतात तिसरी परंपरा जी. महाराष्ट्र टाईम्स ने सुरू केली नंतर लोकमतन केली ती नवरात्रामध्ये विशिष्ट रंगांचे कपडे घालून ते पूर्वी फक्त बायकांपुरत होता आता मी बघतो की पुरुष सुद्धा तसेच सगळा महाराष्ट्र एक-एका रंगामध्ये रंगलेला दिसतो. मला असं बघायला खरंच आवडेल की महाराष्ट्रभर हा जो राज ठाकरेंच्या प्रेरणेतून कार्यक्रम होतोय आणि इतके कवी जे मुळामध्ये कवी नाहीयत ते कविता म्हणतायत आणि असे कार्यक्रम या दिवशी महाराष्ट्रभर होतायत आणि जागोजागी ठीक ठिकाणी या पद्धतीन कवितांच वाचन होतय मला डोळ्यासमोर आलं तरी सुद्धा मन असं उल्हसून गेलं आणि आनंदाने मन भरून गेलं की असे कार्यक्रम ही परंपरा जर महाराष्ट्रभर पसरेल तर काय सुंदर म्हणजे सगळ्या देशाला हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं काहीतरी यातून निर्माण होईल त्यामुळे अशा कार्यक्रमाचा आयोजन केल्याबद्दल आणि त्यात बोलावल्याबद्दल. खूप मनापासून आभार, मी जी कविता म्हणणार आहे ती कुसुमाग्रजांची स्वधर्म या नावाची आहे. खरं तर या कवितेच्या बद्दल मी असं सांगेन की आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो आणि आपल्याला अमुक पद्धतीन आपण का वागू शकलो नाही, इथं असं आपण का करू शकलो नाही अमुक. असा वागला आणि त्याने त्याचं कसं त्याला काहीतरी मिळालं आणि आपल्याला त्याच्यासारखं वागता येत नाही याची मनामध्ये खंत होते, मन खंतावत, दुःख होतं आणि खरं तर अस आहे की आपण जसे असतो तसेच आपण असतो, त्यामुळे आपण इतर कुणासारखं बनण्याचा उगाच प्रयत्न करायच्या फंदात पडू नये, तुमचं तुमचं जे आहे तेच तीच तुमची ओळख आहे आणि तीच खूप. आहे तोच तुमचा स्वधर्म आहे या अर्थाची ही कविता, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता, माझ्या मते इथपर्यंत सगळ्यांना कळल असेल. धरेला वाहात जा तू जलापरी धगधग त्या बिजलीस बसाया दवाप्रमाणे फुलावरी आपण बिजलीला कधी असं दवाप्रमाणे फुलावर बस अस असेही सांगू शकत नाही तसेच आहे मी पण माझे तयासारखे तेच असे तसेच आहे मी पण माझे तयासारखे तेच असे अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. अभेद्य असले, अभेद्य असले, अजिंक्य असले, भले बुरे पण तुटेल का, तुटल्यावरती आणििक काही, शून्या वाचूनी उरेल का? मला असं वाटत की यातून जो काही बोध आहे की आपण आपल्यासारखच असावं, राहावं ही या कवितेतून फार नेमकेपणाने, चपकलपणाने असं त्यातन आलेला आहे, जे माझ्या खूप हृदयाच्या जवळची अशी कविता आहे आणि माझी खात्री आहे की यानंतर आपल्या मनामध्ये कधी हा असा का तो तसा का असा प्रश्न येणार नाही, आपण जसे आहोत तेच अस्सल आहे, आपण तसच राहावं.























