कोरोना व्हेरियंट वारंवार रुप बदलणारा, सतर्क राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन
कोरोनाचा व्हेरियंट वारंवार रुप बदलणारा आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तिसरी लाट रोखण्यासाठी चाचण्या आणि उपचार यावर अधिक जोर देण्याची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांत हिल स्टेशनवर होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरही मोदींनी चिंता व्यक्त केलीय. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दरम्यान 16 जुलैला मोदी महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यात सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष देणार आहेत.






















