एक्स्प्लोर
Special Report Thackeray Brothers Alliance: उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, 'आम्ही दोघे समर्थ'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे इंडिया आघाडीत सामील होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याला कारण ठरलं उद्धव ठाकरेंनी दिल्लीत केलेलं एक वक्तव्य. राज ठाकरेंसोबत युतीचा निर्णय घेण्यासाठी दोघे समर्थ आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर चर्चेची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर इंडिया आघाडीला कोणताही आक्षेप नसेल, असा एक अर्थ काढण्यात येत आहे. तर, काँग्रेसला न विचारता उद्धव ठाकरेंना काही करता येणार नाही, असा टोला शिंदे गटाच्या मंत्र्यांनी लगावला. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, राज ठाकरे यांचा इंडिया आघाडीत समावेश होणे कठीण आहे, कारण काँग्रेस याला कधीच मान्यता देणार नाही, असे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. बिगर-मराठी भाषिकांवरील हल्ल्यांचा मुद्दा काँग्रेससाठी अडचणीचा ठरू शकतो. यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी विचारपूर्वक निर्णय घेईल, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
महाराष्ट्र
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र























