एक्स्प्लोर
Mahapalikecha Mahasangram Sangli : 2 वर्ष रखडलेली निवडणूक,सांगलीकर त्रस्त;पालिकेचं समीकरण बदलणार?
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक दोन वर्षांपासून रखडलेली असून शहरात प्रशासक राजवट आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक पाणी टंचाई, खराब रस्ते, नदी प्रदूषण आणि उद्यानांच्या दुरवस्थेसारख्या गंभीर समस्यांनी त्रस्त आहेत. 'राजकारण कमी राहू दे, सांगली चांगली कशी व्हावी याच्यात लक्ष द्या,' अशी थेट मागणी नागरिक करत आहेत. कृष्णा नदीत शेरीनाल्याचे दूषित पाणी मिसळत असल्याने गरोदर महिलांना संसर्ग होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, नदीत मगरींचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी गांजा आणि दारू यांसारखे समाजविघातक प्रकार वाढले असून, रस्ते आणि पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, ज्यामुळे नागरिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















