एक्स्प्लोर
Maharashtra Wet Drought | तेलंगणात जे झालं ते महाराष्ट्रात का नाही?
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता मुख्यमंत्र्यांसह राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पिक डोळ्यादेखत वाहून गेलं, घरं पडली, काही लोकांचे बळी गेले, जनावरं दगावली अन् शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मदत मात्र शून्य. शेजारच्या तेलंगणामध्येही विशेषत: हैदराबादमध्ये पावसाने मोठा हाहा:कार माजवला होता. मात्र तिथल्या सरकारनं लोकांना तात्काळ दिलासा देत मदत केली. तेलंगणा सरकारसोबत बाहेरील राज्यांकडूनही मदतीची घोषणा केली. तसेच तिथल्या कलाकारांनी देखील मदतीचा हात दिला. महाराष्ट्रात मात्र केवळ सोशल मीडियात दौऱ्यांचे फोटो, पोकळ संवेदनाच दिल्या जात असल्याचं चित्र आहे. ना सरकारनं कुठली मदत केली, ना बाहेरील राज्यांनी कुठली मदत केली, ना अजून कुठले कलाकार या बळीराजाच्या मदतीला आलेत.
महाराष्ट्र
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
क्राईम

















