एक्स्प्लोर
Maharashtra Rains | कोकण, विदर्भात मुसळधार, धरणं ओव्हरफ्लो
कोकण आणि विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे एकोणीस दरवाजे एक मीटरने तर चौदा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून एक लाख सत्त्याण्णव हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आधीच्या तुलनेत अडुसष्ठ हजार पाचशे सोळा क्युसेकने विसर्ग वाढला आहे. हिंगोली जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत एकाच दिवसात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली. सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी एक्कावन्न टक्के झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आरसोली लघु प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे भूम शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























