एक्स्प्लोर
Bala Nandgaonkar on Governor : राज्यपालांनी सुद्धा मराठीत बोलावं, मनसेचा इशारा?
मराठी-हिंदी वादावर राज्याच्या राज्यपालांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अशी वृत्ती दीर्घ काळात राज्याचे नुकसान करू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. भाषेवरून द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भाषिक द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले आहे. राज्यपालांनी भाषेच्या मुद्द्यावर वक्तव्य केल्यानंतर मनसेची भूमिका समोर आली आहे. राज्यपालांनीही मराठी बोलले पाहिजे, असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. तसेच, या राज्यात आलेल्या इतर भाषिकांनी मराठी शिकले पाहिजे, असेही नमूद करण्यात आले आहे. यूपीएससी आणि आयएएस होऊन येणारे अधिकारी मराठी भाषा शिकतात, तर इतरांनी का शिकू नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी वादात सापडलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. एका मंत्र्याचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तर तिसरे मंत्री चड्डी बंदीने गँग बनवून बसलेले आहेत, या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. दरम्यान, भाषेवरून वाद नको, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि मातृभाषा प्रत्येकाला यायला पाहिजे. येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
पुणे






















