एक्स्प्लोर
Sugarcane Protest: ऊस दरावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला, शेतकरी आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'ऊस उत्पादक शेतकरी हा ऊसाच्या चिपाड्यावर जगतोय आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेनं भरलेल्या पोत्यासारखे गलेलठ्ठ झाले आहेत', अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत ऊसाला प्रति टन ७५१ रुपये पहिली उचल मिळत नाही, तोपर्यंत ऊसाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सरकारने १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, दर निश्चित होत नसल्याने कारखाने सुरू होण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी ऊस वाहतूक रोखण्यात आली असून, काही वाहनांची जाळपोळ झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















