एक्स्प्लोर
Maharashtra : श्रीरामपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, 40 वर्षांनी स्वप्नपूर्ती
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावर विरोधी पक्षनेते सचिन बडदे यांनी टीका केली आहे, 'फक्त बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजी मंडई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत आहे, हा सर्व जनतेच्या भावनेचा खेळवाड आहे'. गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीरामपूरकरांनी पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे, हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, पुतळ्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला असून, शिवाजी चौकाऐवजी नेहरू भाजी मार्केटजवळ पुतळा बसवल्याने शिवसेना (UBT) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मक्लेष आंदोलन करत याला विरोध दर्शवला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
भारत
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement

















