Aditya Thackeray Full PC : राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?; आदित्य ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
Aditya Thackeray Full PC : राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?; आदित्य ठाकरेंची सरकारवर जहरी टीका
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात सरकारचं सध्या कोणाकडेही लक्ष नाही आहे. पुण्यातअनेक ठिकाणी चुकीची कामं सुरु आहेत. या चुकीच्या कामांना सरकार दुजोरा देत असल्याचं दिसत आहे. हे सरकार कंत्राटदारांचं आहे की सर्वसामान्याचं आहे?, असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?, असाही हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.



















