Kolhapur Loudspeaker : कोल्हापुरात 400 मशिदीमध्ये नेहमी प्रमाणे आजान, कुणाचाही विरोध नाही ABP Majha
राजर्षी शाहू महाराजांच्या समतेचा विचार करवीर नगरीमध्ये इतका खोलवर पोहोचला आहे की, जातीय किंवा धार्मिक तेढ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही पाहायला मिळाली नाही...म्हणूनच आज जिल्ह्यामध्ये 400 मशिदीमध्ये नेहमी प्रमाणे आजान वाचली गेली...आणि त्याला कुणाकडूनही विरोध झाला नाही...शिवजयंती असो किंवा शाहू जयंती असो....मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहानं सहभाग घेतात...तर हिंदू बांधव थेट मशिदीत ईदच्या शुभेच्छा देतात...कोल्हापुरातील अनेक तालमींमध्ये गणेशोत्सव आणि पिर यांच्या एकत्र स्थापना केली जातेय...अशा वेळी आजान आणि हनुमान या मुद्द्यावर कोल्हापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांना नेमकं काय वाटतं जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....



















