एक्स्प्लोर
Farmers Protest | शेतकरी आणि सरकारमध्ये आज बैठक; तिढा सुटणार की वाढणार?
Farmers Protest : आज सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. गेल्या 39 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बळीराजाचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. सरकारला विश्वास आहे की, आज पार पडणाऱ्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल आणि आंदोलनाची वाटचाल शेवटाच्या दिशेने होईल. दरम्यान, याआधी 41 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात 30 डिसेंबर रोजी बैठक पार पडली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























