एक्स्प्लोर
Bihar Election Dates Announced: बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यात निवडणुका
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
असे असणार बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे
पहिला टप्पा- 16 जिल्ह्यातील 71 जागा (28 ऑक्टोबर)
दुसरा टप्पा- 17 जिल्ह्यातील 94 जागा (3 नोव्हेंबर)
तिसरा टप्पा- 15 जिल्ह्यातील 78 जागा ( 7 नोव्हेंबर)
मतमोजणी आणि निकाल - 10 नोव्हेंबर
बिहार निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स
- एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान
- निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख पीपीई कीट, 6.5 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे.
- सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील.
- कोरोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे.
- आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील.
- निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे.
- अर्ज भरण्यासाठी दोनच व्यक्ती सोबत ठेवू शकणार. घरोघरी प्रचारादरम्यान पाच लोकांच्या वर लोकं असू नयेत
- प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा


















