एक्स्प्लोर
अंबरनाथच्या नेवाळी परिसरात हजारो झाडांची पुन्हा जाळपोळ | स्पेशल रिपोर्ट | कल्याण | एबीपी माझा
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावलेली हजारो झाडं अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. अंबरनाथच्या नेवाळी परिसरात सरकारच्या वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत श्रीकांत शिंदेंनी ही झाडं लावली होती. नेवाळी परिसरातल्या तीन टेकड्यांवर वर्षभरापूर्वी सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेली अनेक झाडं जगवण्यात वन विभागाला यश आलं होतं. यानंतर बुधवारी रात्री पुन्हा एकदा याच झाडांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून लागवड केलेली 70 टक्के झाडं जळाली आहेत. या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदेंनी केली आहे. या घटनेमागे माती माफियांचा हात असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई




















