Zero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चा
नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी कुणी जर विचारलं की महाराष्ट्रात सर्वात महत्वाची इमारत कोणती...? तर कोणीही सांगेल की मंत्रालय...
कारण, इथूनच आपल्या राज्याच्या... महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो.. त्यातही सर्वात महत्वाचा मजला कोणता... तर उत्तर सहावा मजला... जिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची केबिन्स आहे..
आता तुम्ही म्हणाल की मंत्रालयाचा हा भूगोल... आम्ही आता का सांगतोय.. तर उत्तर आहे...
एक महिला..
त्यांचं नाव धनश्री सहस्रबुद्धे..
याच धनश्री काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात पोहोचल्या..
आता इथं आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे धनश्री सहस्रबुद्धे पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात गेल्या कशा?
कारण सर्वसामान्यांना मंत्रालयात जाण्यासाठीचा मिळणारा पास हा फक्त संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचाच मिळतो..
तुमच्यापैकी कधी कोणी मंत्रालयात आलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील... तर
तुम्हालाही याची कल्पना असावी.
आता पुढची गोष्ट ऐका..
जेव्हा याच धनश्री सहस्रबुद्धे मंत्रालयात पोहोचल्या.. त्याही पास न काढता..
इतकंच नाही तर त्या मंत्रालयात शिरल्या.. आणि त्यांनी थेट सहावा मजला गाठला... तिथून त्या पोहोचल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर... तिथं त्यांनी आरड़ाओरडा करायला सुरुवात केली.. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडली.. दालनातील कुंड्यांचीही नासधूस केली...
इतका सगळा प्रकार घडला.. महिलेच्या घरी पोलीसही पोहोचले.. चौकशी सुरु केली... आणि पुढे आलं मुळ कारण... धनश्री सहस्रबुद्धेंची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती समोर आली... त्यानंतर त्यांचं समुपदेशनही करण्यात येतंय... धनश्री सहस्रबुद्धे यांनी याआधीही भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता.. तसंच राहत्या सोसायटीमध्येही त्यांनी अनेकांशी भांडणं केल्याच्या तक्रारी आहेत.. इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टानं धनश्री सहस्रबुद्धे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिले होते.. तरीही या धनश्री विनापास मंत्रालयात शिरल्या कशा..? याचाच तपास पोलीस करतील.. पण, घटनेनं जो प्रश्न उपस्थित केलाय.. तोच प्रश्न आम्हीही आज महाराष्ट्राला विचारलाय... तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..
झीरो अवरमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत.. आता चर्चा करुयात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या डिक्शनरीची... बरं, ही डिक्शनरी अशी आहे.. की त्यातले काही शब्द... आम्हालाही बीप करावे लागतायेत...
आता हेच बघा...
आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीची जेव्हा केव्हा चर्चा केली जाईल.. त्याच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा उल्लेख नक्की होईल.. पत्रकार म्हणून संजय राऊतांनी कारकीर्द सुरु केली.. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.. जो आजही सुरुच आहे.. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये जे संजय राऊत देशानं पाहिलेत.. ते एकदम आक्रमक स्वरुपातच... मविआच्या फॉर्मेशनमध्येही त्यांची भूमिका महत्वाची होती..तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत... आणि अमित शाहांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत... अशा प्रत्येक विरोधी नेत्याला अंगावर घेण्यासाठी सर्वात पुढे असातात ते संजय राऊत..
पण, ते राऊत.. कधी कधी इतके आक्रमक होवून जातात की... त्यांना त्याचा फटकाही बसतो.. आता आजचंच उदाहऱण घ्या.. राजकीय पलटवार करण्याच्या नादात संजय राऊतांनी जी वक्तव्य केली.. त्यावरुन नवा संघर्ष पेटला.. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या डिक्शनरीतून एक एक नवा शब्द बाहेर आला... ज्यानं एक लक्षात आलं... की विरोधकांवर टीका करण्यसाठी राज्यात कोणत्याही शब्दांचा वापर केला जावू शकतो..... ही सगळी डिक्शनरी पाहणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात संजय राऊतांच्या वक्तव्यानं..
All Shows
































