एक्स्प्लोर
Politics On Samruddhi Highway Accident Special Report : समृद्धीवर अपघात, राजकारण जोरात
सध्या राज्यातलं चित्र बघितलं तर राजकारण्यांना आरोप प्रत्यारोपांसाठी मुद्दे लागतातच असं नाहीये. आता बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. पण पेटलेल्या बसची आग विझत नाही तो या आगीवर राजकीय आरोपांच्या पोळ्या भाजायला सुरुवात झालीये. अपघात झाला तर त्याची कारणं काय, तो कसा झाला... त्याला जबाबदार कोण.. असे अपघात होऊ नये म्हणून काय करणं अपेक्षित आहे या मुद्दयांवर चर्चा झालीच पाहीजे पण अपघातग्रस्तांच्या सरणावर राजकीय पोळी भाजणं दुर्दैवी आहे. त्यामुळे कोणत्या प्रसंगी काय बोलावं याचंही भान काही नेत्यांना राहीलं नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतोय.
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग


































