एक्स्प्लोर

IND vs ENG: भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. 

भारताच्या पराभवाची पाच कारणं

भारताची सलामी जोडी पुन्हा फ्लॉप
इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. केएल राहुल पाच चेंडूत 5 धावा करून बाद झाला. तर, रोहित शर्मानं 28 चेंडूत 27 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांचा स्ट्राईक रेट 100 किंवा त्याहून कमी होता. टी-20 क्रिकेटमध्ये विरुद्धसंघासमोर विशाल लक्ष्य ठेवायचं असल्यास सलामीवीरांची भूमिका महत्वाची ठरते. सलामीवीरांना पावर प्लेचा फायदा घेत पहिल्या सहा षटकात जास्तीत जास्त धावा करायच्या असतात. पण इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. या सामन्यात भारतानं पहिल्या सहा षटकात फक्त 38 धावा केल्या होत्या. 

मोठ्या सामन्यात सूर्या अपयशी
टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं सातत्यानं धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सामन्यातही सूर्याकुमार यादवच्या बॅटीमधून धावांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, या सामन्यात सूर्याकुमार 14 धावा करून माघारी परतला. ज्यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. आदील राशीदच्या चेंडूवर मोठ्या शॉट खेळण्याचा प्रयत्नात सूर्या आऊट झाला.

भारताची खराब गोलंदाजी
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडसमोर 168 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, हे लक्ष्य रोखण्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. या सामन्यात भारताला एकही विकेट्स मिळवता आला नाही. 

बटलर-हेल्सची वादळी खेळी
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं सुरुवातीपासूनच वादळी खेळी केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि इंग्लंडच्या संघाला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिल्यानंतर माघारी परतले.

इंग्लंडची तगडी गोलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंड संघानं चांगली सुरुवात केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. दरम्यान, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात भारतीय फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. ख्रिस जॉर्डन आणि सॅम करनसह सर्व गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केली. 

हे देखील वाचा- 

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी, रोहित शर्माला अश्रू अनावर; डगआऊटमधील इमोशनल व्हिडिओ समोर

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget