एक्स्प्लोर

कर्णधार विराट कोहलीच्या मते कशामुळे झाला भारताचा पराभव?

'सामन्याचा पूर्वार्ध आमच्यासाठी चांगला होता. आम्ही खूप चांगले खेळलो. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. पाठलाग करता येईल, अशा धावसंख्येवर आम्ही न्यूझीलंडला रोखलं. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यावर फरक पडला' असं कोहली पराभवानंतर म्हणाला.

मुंबई : रवींद्र जाडेजाच्या ऐतिहासिक आणि धोनीच्या साहसी खेळीनंतरही भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टीम इंडियाचं विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इर्षेने भारतीय संघ मैदानात उतरला. मात्र पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विजयाचं श्रेय दिलं आहे. 'सामन्याचा पूर्वार्ध आमच्यासाठी चांगला होता. आम्ही खूप चांगले खेळलो. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. पाठलाग करता येईल, अशा धावसंख्येवर आम्ही न्यूझीलंडला रोखलं. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यावर फरक पडला' असं कोहली पराभवानंतर म्हणाला. कोहलीने रवींद्र जाडेजाचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जाडेजाने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी बजावली. त्याची खेळी संघासाठी सकारात्मक ठरली. एक गोष्ट मान्य करणं कितीही कठीण असलं, तरी न्यूझीलंडचा संघ विजय डिझर्व्ह करतो. त्यांनी आम्हाला सतत दबावाखाली ठेवलं' असं कोहली म्हणाला. फलंदाजांचं शॉट सिलेक्शन वाईट होतं. त्यामुळे पराभव चाखावा लागला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र नॉकआऊटमध्ये न्यूझीलंड संघ साहसाने क्रिकेट खेळला, असं मत कोहलीने व्यक्त केलं. सामन्यानंतर कोहलीने चाहत्यांचेही आभार मानले.

Ind vs NZ | न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम

विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत मजल मारली. रोहित शर्मा, के एल राहुल या सलामीवीरांसोबतच कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताच्या फायनलचं तिकीट मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या. पहिल्या दहा षटकांमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावे जमा झाला आहे. सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये 27 धावा करण्याचा न्यूझीलंडचा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला. भारताने पहिला पॉवरप्ले समाप्त होईपर्यंत चार गडी गमावून 24 धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये काल (बुधवारी) उपान्त्य सामन्याला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे काल न्यूझीलंड 46.1 षटकांत पाच बाद 211 धावांवर खेळत असताना सामना थांबवण्यात आला. उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला, तेव्हा न्यूझीलंडने आणखी तीन विकेट गमावत 50 षटकात 239 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. राहुल, रोहित आणि विराट हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती. रवींद्र जाडेजाने 77 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. मात्र मार्टिन गप्टिलने धोनीला रनआऊट करत भारताच्या उरल्यासुरल्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडवल्या. न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे, तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकत, 15 गुण मिळवून अव्वल ठरत भारताने उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली होती. मात्र उपान्त्य फेरीतच विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ भारतावर आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Team India Victory Parade In Mumbai: विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget