Axar Patel: अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकप्तान असूनही प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवण्याची कोणाच्या सुपिक डोक्यातील खेळी? पहिल्यांदाच धक्कादायक माहिती समोर
Axar Patel: अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण आता भारताच्या नियोजनामागील कारण उघड झाले आहे.

Axar Patel: टी- विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा सेमीफायनलपर्यंतचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची सर्वात मोठी कारणे म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी आणि उपकप्तान असूनही अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे.
अक्सरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण आता भारताच्या नियोजनामागील कारण उघड झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यापूर्वी अक्षरला का वगळण्यात आले हे भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी उघड केलं आहे.
अक्षर पटेलशी दीर्घ चर्चा केली
कोटक म्हणाले की, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्यापूर्वी अक्षर पटेलशी दीर्घ चर्चा केली आणि प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळण्याची कारणे स्पष्ट केली. अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार देखील आहे. त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय प्रश्न निर्माण करण्यास भाग पाडणारा होता. कोटक म्हणाले, "सूर्य आणि गौतम त्याच्याशी बोलले. त्यांना वाटले की वरच्या फळीत तीन डावखुरे फलंदाज असल्याने एक ऑफ-स्पिनर आवश्यक आहे. आम्ही सुरुवातीच्या विकेटही घेतल्या. वॉशिंग्टनने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली नाही, जरी तो प्रत्यक्षात पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणार होता." कोटक यांनी स्पष्ट केले की टीम मॅनेजमेंटने दक्षिण आफ्रिकेच्या डावखुरे फलंदाजांना वरच्या फळीत लक्षात घेऊन ऑफ-स्पिनरला प्राधान्य दिले, जरी सामन्यादरम्यान गोलंदाजीच्या योजना बदलल्या.
दोन सामन्यांमध्ये 'करो या मरो' परिस्थितीत
सुपर 8 टप्प्यातील पराभवानंतर, भारत आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये 'करो या मरो' परिस्थितीत आहे. तथापि, कोटकचा असा विश्वास आहे की खेळाडूंना दबाव हाताळण्याची सवय झाली आहे. टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारत आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर 8 सामन्यांपूर्वी लवकरात लवकर आपला संयम परत मिळवण्याचा प्रयत्न करेल.
इतर महत्वाच्या बातम्या






















