T20 World Cup: घरच्या मैदानात टी-20 वर्ल्डकप होत असतानाही टीम इंडिया जर तरच्या सापळ्यात भयंकर अडकली! फक्त दोन्ही सामने जिंकून फायदा नाहीच, तर...
T20 World Cup: पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे.

T20 World Cup SemiFinal: टी-20 वर्ल्डकपचा थरार आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. ग्रुप-1 मध्ये सध्या टीम इंडियाची स्थिती काहीशी नाजूक असली तरी, सेमीफायनलची दारे अजूनही बंद झालेली नाहीत. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे.
भारतासाठी पहिली अट, 'दोन सामने, दोन विजय'
टीम इंडियाला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने (वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध) जिंकणे अनिवार्य आहे. जर भारताने एक सामना गमावला, तर भारताचे जास्तीत जास्त 2 गुण होतील. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजपैकी किमान दोन संघ 4 गुणांपर्यंत सहज पोहोचतील आणि भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे 4 गुण मिळवणे हे भारताचे पहिले लक्ष्य असेल.
सेमीफायनलची दोन समीकरणे:
भारत सहज पात्र होईल (जर...)
जर भारताने आपले दोन्ही सामने जिंकले आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केले, तर दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह अव्वल स्थानी राहील आणि भारत 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तसेच, जर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला हरवून मोठा उलटफेर केला, तरीही भारताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या परिस्थितीत नेट रन रेटची फारशी गरज भासणार नाही.
अवघड मार्ग: नेट रन रेटचा पेच (जर...)
जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला हरवले, तर गुणतालिकेत मोठा पेच निर्माण होईल. अशा वेळी, वेस्ट इंडिज 4 गुण, दक्षिण आफ्रिका 4 गुण आणि भारत 4 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रन रेट (NRR) निर्णायक ठरेल. सध्या भारताचा रन रेट -3.800 असा उणेमध्ये आहे. त्यामुळे भारताला केवळ जिंकून चालणार नाही, तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने धूळ चरावी लागेल, जेणेकरून रन रेटमध्ये सुधारणा होईल.
भारत सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या
- स्वतःचे दोन्ही सामने जिंकणे.
- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवावे जेणेकरून रन रेटचे टेन्शन राहणार नाही.
- भारतीय चाहत्यांच्या नजरा आता आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या हाय-व्होल्टेज सामन्यावर खिळल्या आहेत. सूराय सेनेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी सांघिक कामगिरीची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























