एक्स्प्लोर

अंडर-19 : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडिया चौथ्यांदा विश्वविजेता बनणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे.

मुंबई : अंडर-19 विश्वचषक कोण जिंकणार, पृथ्वी शॉचा भारतीय संघ की, जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ? न्यूझीलंडमध्ये आयोजित अंडर – 19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या खेळवण्यात येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे. सेमीफायनलमध्ये भारताचा डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या अर्शद इक्बालला माघारी धाडलं आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघाचं अंडर -19 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म झालं. भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सेमीफायनल तब्बल 203 धावांनी जिंकला. अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता भारताचा मुकाबला जेसन सांघाच्या ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून या विश्वचषकाची फायनल गाठली आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने 2000, 2008 आणि 2012 साली, तर ऑस्ट्रेलियाने 1998, 2002 आणि 2010 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉचा भारतीय संघ आणि जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ यंदा चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अंडर-19 विश्वचषकाचा हा अंतिम सामना शनिवारी माऊंट मॉन्गानुईच्या रणांगणात खेळवण्यात येईल. योगायोगाची गोष्ट म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला साखळी सामनाही माऊंट मॉन्गानुईच्याच मैदानात खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचं मनोबल हे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत उंचावलेलं असेल. अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाची मदार प्रामुख्याने चार फलंदाजांवरच राहिल. कर्णधार पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमन गिल आणि हार्विक देसाई या चौघांनीच या विश्वचषकात सातत्याने धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये नाबाद शतक झळकावणारा शुबमन गिल हा या विश्वचषकातला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. शुबमनने पाच सामन्यांमधल्या चार डावांत तब्बल 341 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तीन अर्धशतकं आणि एक नाबाद शतकाचा समावेश आहे. शुबमनची सरासरी आहे 170.50. कर्णधार पृथ्वी शॉने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 77.33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीच्या मनज्योत कालराने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. यष्टिरक्षक हार्विक देसाईने तीन सामन्यांमधल्या तीन डावांत 55 च्या सरासरीने 110 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. अंडर-19 विश्वचषकात भारताचं आक्रमणही भलतंच धारदार ठरलं आहे. दुखापतीतून सावरलेल्या ईशान पोरेलने पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना माघारी धाडून भारताला उपांत्य सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला. पण ईशान पोरेलआधी अनुकूल रॉय, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि अभिषेक शर्मा या चौघांनीही या विश्वचषकावर आपला ठसा उमटवला आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या अनुकूल रॉयने पाच सामन्यांमध्ये अवघ्या 95 धावा मोजून बारा फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 14 धावांत 5 विकेट्स ही त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली. वेगवान गोलंदाज शिवम मावीने पाच सामन्यांमध्ये 124 धावा मोजून 8 विकेट्स घेतल्या आहेत. 45 धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कमलेश नागरकोटीच्या वेगानेही या विश्वचषकात धुमाकूळ घातला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 106 धावा मोजून 7 फलंदाजांचा काटा काढला आहे. त्याची 18 धावात 3 विकेट्स ही विश्वचषकातली सर्वोत्तम कामगिरी आहे. डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 66 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. अकरा धावांत दोन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या शिलेदारांनी अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलआधी बजावलेली वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस असली, तरी ती सारी कामगिरी हा आता इतिहास झाला आहे. त्यामुळे त्या कामगिरीने हुरळून न जाता भारतीय संघ फायनलच्या रणांगणात उतरला, तर विश्वचषक जिंकणं कठीण ठरणार नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
KKR vs DC Live Score Updates : दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
MI vs RR IPL 2026 : फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video
फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget