एक्स्प्लोर

आक्षेपार्ह ट्वीटबाबत हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण

सध्या पंड्याच्या ट्विटवर 26 डिसेंबर 2017 रोजी कोणतंही ट्वीट दिसत नाही. त्यामुळे पंड्याच्या नावे केलेलं ट्वीट बनावट अकाऊंटवरुनही असू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पंड्याने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळले आहेत. "डॉ. आंबेडकरांबद्दल मी कोणतीही अपमानजनक टिप्पणी केली नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केलं असून, त्यामध्ये माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीचा वापर केला आहे," असं पंड्याने स्पष्ट केलं आहे. "माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे," असंही हार्दिक पंड्याने नमूद केलं आहे. हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करुन त्यांचा अपमान केल्याच्या अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पसरल्या आहेत. पण मला याबाबात माझी बाजू स्पष्ट करायची आहे. ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मी ट्वीट अथवा वक्तव्य केलेलं नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केलं असून, त्यामध्ये माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीचा वापर केला आहे. मी केवळ माझं अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनच ट्वीट करतो. माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि सर्व समाजबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे. मी कधीही  अशाप्रकारच्या वादात पडत नाही, ज्यात एखादा समाज निशाण्यावर येईल. मी सोशल मीडियाचा वापर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी करतो. संबंधित ट्वीट बनावट असून मी ते केलेलं नाही, हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात आवश्यक पुरावे उपलब्ध करुन देईन. माझी प्रतिमा मलीन व्हावी ह्यासाठीच कोणीतरी जाणीवपूर्वक हे ट्वीट केल्याचा मुद्दाही उपस्थित करणार आहे. सध्या देशातील अनेक प्रसिद्ध लोकांना याचा सामना करावा लागत आहे. काय आहे प्रकरण? पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप करत जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती. ती कोर्टाने मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हार्दिक पंड्या अडचणीत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश ट्वीटमुळे पंड्या अडचणीत हार्दिक पंड्याने 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. पंड्याने बाबासाहेबांबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने, त्याने दलित समाजाच्या भावना भडकवल्या, असा आरोप मेघवाल यांनी केला आहे. पंड्याचं ट्वीट, मेघवाल यांचा दावा पंड्याने ‘कोण आंबेडकर?’ असं ट्विट केल्याचा दावा मेघवाल यांनी केल्याचं वृत्त, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. सध्या पंड्याच्या ट्विटवर 26 डिसेंबर 2017 रोजी कोणतंही ट्वीट दिसत नाही. त्यामुळे पंड्याच्या नावे केलेलं ट्वीट बनावट अकाऊंटवरुनही असू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र सध्या त्याबाबत काहीही स्पष्ट न झाल्याने कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
Embed widget