एक्स्प्लोर

रणजीचा रणसंग्राम : मुंबई, विदर्भाची दमदार सुरुवात; महाराष्ट्राच्या गोलंदाजांकडून निराशा

आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. तर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली.

मुंबई : रणजी करंडकाच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिलाच दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला. पण महाराष्ट्र आणि हरयाणा संघांमधल्या सामन्यात हरयाणवी फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

विदर्भासमोर आंध्र प्रदेशचं लोटांगण

आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. टीम इंडियाचा युवा कसोटीवीर हनुमा विहारीचा अपवाद वगळता आंध्रच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विहारीनं 83 धावांचं योगदान दिलं. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटेनं चार आणि रजनीश गुरबानीनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर यश ठाकूरनं दोन आणि ललित यादवनं एक विकेट घेतली.

आंध्र प्रदेश - 211/10 विदर्भ - 26/0 (पहिल्या दिवसअखेर)

मुंबईची दमदार फलंदाजी

पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली. त्यानंतर तळाच्या शम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूरनंही बडोद्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतकं झळकावली. त्यामुळे मुंबईनं पहिल्या दिवसअखेर आठ बाद 380 धावांची मजल मारली आहे. पृथ्वीनं अकरा चौकार आणि एका षटकारासह 66 धावांची खेळी उभारली. या कामगिरीसह पृथ्वीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केलं. अजिंक्य रहाणेनं 10 चौकारांसह 79 धावांची खेळी साकारली. तर शम्सनं नाबाद 56 आणि शार्दूलनं 64 धावा फटकावल्या.

मुंबई - 380/8 (पहिल्या दिवसअखेर)

महाराष्ट्राच्या गोलंदाजांची निराशा

रणजी करंडकाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मात्र निराशा केली. रोहतकमध्ये सुरु असलेल्या सामन्यात हरयाणानं पहिल्या दिवशी 3 बाद 279 अशी मजल मारली आहे. हरयाणाच्या शुभम रोहिला आणि शिवम चौहाननं खणखणीत शतकं झळकावली. महाराष्ट्राकडून समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि प्रदीप दधेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

हरयाणा - 279/3 (पहिल्या दिवसअखेर)

वासिम जाफरचा 150 वा सामना

दरम्यान विदर्भाच्या वासिम जाफरनं आज रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150 वा सामना ठरला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत 150 सामन्यात 11 हजार 775 धावांचा रतीब घातलाय. त्यात सर्वाधिक 40 शतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget