एक्स्प्लोर

रणजीचा रणसंग्राम : मुंबई, विदर्भाची दमदार सुरुवात; महाराष्ट्राच्या गोलंदाजांकडून निराशा

आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. तर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली.

मुंबई : रणजी करंडकाच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिलाच दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला. पण महाराष्ट्र आणि हरयाणा संघांमधल्या सामन्यात हरयाणवी फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

विदर्भासमोर आंध्र प्रदेशचं लोटांगण

आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. टीम इंडियाचा युवा कसोटीवीर हनुमा विहारीचा अपवाद वगळता आंध्रच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विहारीनं 83 धावांचं योगदान दिलं. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटेनं चार आणि रजनीश गुरबानीनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर यश ठाकूरनं दोन आणि ललित यादवनं एक विकेट घेतली.

आंध्र प्रदेश - 211/10 विदर्भ - 26/0 (पहिल्या दिवसअखेर)

मुंबईची दमदार फलंदाजी

पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली. त्यानंतर तळाच्या शम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूरनंही बडोद्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतकं झळकावली. त्यामुळे मुंबईनं पहिल्या दिवसअखेर आठ बाद 380 धावांची मजल मारली आहे. पृथ्वीनं अकरा चौकार आणि एका षटकारासह 66 धावांची खेळी उभारली. या कामगिरीसह पृथ्वीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केलं. अजिंक्य रहाणेनं 10 चौकारांसह 79 धावांची खेळी साकारली. तर शम्सनं नाबाद 56 आणि शार्दूलनं 64 धावा फटकावल्या.

मुंबई - 380/8 (पहिल्या दिवसअखेर)

महाराष्ट्राच्या गोलंदाजांची निराशा

रणजी करंडकाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मात्र निराशा केली. रोहतकमध्ये सुरु असलेल्या सामन्यात हरयाणानं पहिल्या दिवशी 3 बाद 279 अशी मजल मारली आहे. हरयाणाच्या शुभम रोहिला आणि शिवम चौहाननं खणखणीत शतकं झळकावली. महाराष्ट्राकडून समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि प्रदीप दधेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

हरयाणा - 279/3 (पहिल्या दिवसअखेर)

वासिम जाफरचा 150 वा सामना

दरम्यान विदर्भाच्या वासिम जाफरनं आज रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150 वा सामना ठरला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत 150 सामन्यात 11 हजार 775 धावांचा रतीब घातलाय. त्यात सर्वाधिक 40 शतकांचा समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : गुजरात टायटन्स फायनलमध्ये! वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ, कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, ट्रॉफीसाठी RCBशी भिडणार
गुजरात टायटन्स फायनलमध्ये! वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ, कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, ट्रॉफीसाठी RCBशी भिडणार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : 96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
Vaibhav Sooryavanshi GT vs RR IPL 2026 : वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget