एक्स्प्लोर

भारतात राजकीय स्वार्थासाठी क्रिकेटला लक्ष्य केलं जातंय : पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळेच आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये, अशी मागणी सध्या देशभरातून होत आहे.

इस्लामाबाद : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळेच आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये, अशी मागणी सध्या देशभरातून होत आहे. या प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद म्हणाला की, "भारतात राजकीय स्वार्थासाठी क्रिकेटला लक्ष्य केले जात आहे." जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पाकिस्तान या दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याने भारताने पाकिस्तानची सर्व स्तरांवर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये अशी मागणी देशभर होत आहे. सरफराज अहमद याबाबत म्हणाला की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषकातला सामना आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार खेळवायला हवा. जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत आहेत. राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणे योग्य नाही. क्रिकेट हा खेळ आहे, त्यामुळे भारताने खिलाडूवृत्तीने हा खेळ खेळावा. परंतु भारतात मात्र यावरुन राजकारण केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये असं होत नाही. पाकिस्तानमध्ये राजकीय लोकांकडून खेळात हस्तक्षेप केला जात नाही. विश्वचषकाच्या साखळीत 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर भारतातलं वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. VIDEO | पाहा सचिन काय म्हणतोय INDvsPAK सामन्याबद्दल भारतात दोन गट भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावरुन भारतीय नागरिक, राजकारणी आणि माजी क्रिकेटर दोन गटात विभागले गेले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंह यांच्या म्हणण्यानुसार भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये. तर दुसऱ्या बाजूला महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मते भारत जर पाकिस्तानविरोधात सामना खेळला नाही. तर पाकिस्तानला फुकटचे दोन गुण मिळतील आणि आपले वजा होतील. त्यापेक्षा भारताने हा सामना खेळावा, पाकिस्तानला हरवावं आणि गुणही मिळवावेत. पाकिस्तानला हरवण्यात वेगळीच मजा आहे. हा सामना जिंकून भारतीय खेळाडुंनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Accident : रेल्वे गेट तोडून ट्रक ट्रॅकवर, अमरावती एक्सप्रेसची धडक, जळगावमध्ये अपघातTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 14 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJay Pawar Rutuja Patil : जय पवार अडकणार विवाहबंधनात, आजोबांना दिलं साखरपुड्याचं निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Embed widget