एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र केसरी : 61 किलो गटात पुण्याचा निखिल कदम, सांगलीचा राहुल पाटील फायनलमध्ये
महाराट्र केसरी स्पर्धेत आज खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 61 किलो वजनी गटाच्या माती विभागात सेमी फायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली आहे.
जालना : महाराट्र केसरी स्पर्धेत आज खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 61 किलो वजनी गटाच्या माती विभागात सेमी फायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटीलने उस्मानाबादच्या दत्ता मेटेचा 12-11 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
पुणे शहराच्या निखिल कदमे उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला 4-2 असे नमवून उपांत्यपूर्व गाठली होती. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर 12-11 असा निसटसा पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर 5-4 अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.
61 किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमी फायनलमध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा 10-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर 4-2 अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा 8-2 अशा गुणफरकाने पराभव करून कांस्यपदक पटकावले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर 10-0 अशी मात करत कांस्यपदक जिंकले.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement