Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
सूर्याने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता, कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याला केवळ कर्णधारपदावरूनच हटवण्यात आले नाही, तर संघातूनही वगळण्यात आलं आहे.

Suryakumar Yadav: टी-20 वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला भारतीय संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यरची भारताचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड-आयर्लंड आणि आशियाई खेळांसाठी भारताच्या संघांची घोषणा केली असून, अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे. तो भारतासाठी शेवटचा टी-20 क्रिकेट 2023 मध्ये खेळला होता.
सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया समोर
सूर्याने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता, यावेळी त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याला केवळ कर्णधारपदावरूनच हटवण्यात आले नाही, तर संघातूनही वगळण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात सूर्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. आयपीएल 2026 मध्येही सूर्या सपशेल फेल ठरला. त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघातून वगळल्यानंतर सूर्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. भारताचा संघ जाहीर करताना त्याने लिहिले, "या अत्यंत कुशल टीमला पुढील आव्हानांसाठी हार्दिक शुभेच्छा."
Suryakumar Yadav’s Instagram story. pic.twitter.com/7CGiqazniN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2026
सूर्याचा कर्णधारपदाचा विक्रम
सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदी भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने टीम इंडियाचे 52 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून, त्यापैकी 42 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया केवळ 8 सामने हरली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कधीही मालिका गमावलेली नाही. मात्र, आता त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जर सूर्याने आयपीएल 2026 मध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी केली असती, तर तो संघात राहू शकला असता, पण त्याचा हंगाम खूपच सामान्य राहिला, ज्यामुळे उचलबांगडी झाली आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड T20I साठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.
इतर महत्वाच्या बातम्या






















