एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी

Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटून विराट कोहलीनं आरसीबीचं नेतृत्त्व करावं असं म्हटलं आहे.

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challngers Bengaluru) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) पाच पराभव झाले आहेत. आयपीएलच्या 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. पहिल्याच मॅचमध्ये आरसीबीला चेन्नई सुपर किंग्जनं पराभूत केलं होतं. यानंतर आरसीबीनं केवळ पंजाब किंग्ज विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीला कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जाएंटस, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. काल झालेल्या मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये देखील आरसीबीला मुंबईनं 7 विकेटनी पराभूत केलं. आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरु असल्यानं त्यांचा प्ले ऑफमधील प्रवास अडचणीत आला आहे. आरसीबीच्या या निराशाजनक कामगिरीबद्दल टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे. आरसीबनी कॅप्टनं पदावरून फाफ डु प्लेसिसची हकालपट्टी करुन विराट कोहलीला (Virat Kohli) संधी दिल्यास किमान लढत तरी होईल, असं हरभजन सिंग म्हणाला आहे. 

हरभजन सिंग काय म्हणाला?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या हरभजन सिंगनं आरसीबी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यानं पराभव स्वीकारणाऱ्या आरसीबीचं कर्णधारपद फाफ डु प्लेसिसकडून काढून पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात यावं, असं हरभजन सिंगनं म्हटलं आहे. 

विराट कोहली संघाचा कर्णधार झाल्यास आरसीबी किमान लढत देऊ शकते. विराट कोहली त्याच्या संघातील खेळाडूंना लढण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. विराट कोहलीला कॅप्टन करा ही टीम पुन्हा लढेल आणि जिंकेल, असं हरभजन सिंगनं स्टार स्पोर्टसशी बोलताना म्हटलं आहे.

विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये  322 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. 

विराट कोहलीनं 2013 ते 2021 च्या काळात आरसीबीची कर्णधारपद भूषवलं होतं. 2012 च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीचा उपकर्णधार होता.  फाफ डु प्लेसिस जखमी झाल्यानंतर विराटकडे पुन्हा एकदा आरसीबीचं कर्णधारपद आलं होतं. 

विराच कोहलीनं आरसीबीचं नेतृत्त्व 143 मॅचमध्ये केलं होतं. यामध्ये आरसीबीनं  66 मॅचमध्ये विजय मिळवला होता. तर 70 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 2021 च्या आयपीएलनंतर विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं. फाफ डु प्लेसिसनं आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 32 मॅचमध्ये नेतृत्त्व केलं होतं. यामध्ये 15 मॅचमध्ये आरसीबीनं विजय मिळवला तर  17 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 

आरसीबीचा मुंबईकडून पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील पाचवा पराभव होता. आरसीबीला आतापर्यंत आयपीएलमध्ये  एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

संबंधित बातम्या : 

Hardik Pandya: 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान; तोंडभरुन कौतुकही केलं

Suryakumar Yadav : आम्ही सर्वांनी एबी डीविलियर्सला पाहिलंय, सूर्यकुमार यादव त्यापेक्षा चांगला, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget