एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीला कॅप्टन करा तरच आरसीबी लढेल आणि जिंकेल, माजी क्रिकेटपटूची मोठी मागणी

Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटून विराट कोहलीनं आरसीबीचं नेतृत्त्व करावं असं म्हटलं आहे.

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challngers Bengaluru) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) पाच पराभव झाले आहेत. आयपीएलच्या 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. पहिल्याच मॅचमध्ये आरसीबीला चेन्नई सुपर किंग्जनं पराभूत केलं होतं. यानंतर आरसीबीनं केवळ पंजाब किंग्ज विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीला कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जाएंटस, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. काल झालेल्या मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये देखील आरसीबीला मुंबईनं 7 विकेटनी पराभूत केलं. आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरु असल्यानं त्यांचा प्ले ऑफमधील प्रवास अडचणीत आला आहे. आरसीबीच्या या निराशाजनक कामगिरीबद्दल टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे. आरसीबनी कॅप्टनं पदावरून फाफ डु प्लेसिसची हकालपट्टी करुन विराट कोहलीला (Virat Kohli) संधी दिल्यास किमान लढत तरी होईल, असं हरभजन सिंग म्हणाला आहे. 

हरभजन सिंग काय म्हणाला?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या हरभजन सिंगनं आरसीबी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यानं पराभव स्वीकारणाऱ्या आरसीबीचं कर्णधारपद फाफ डु प्लेसिसकडून काढून पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात यावं, असं हरभजन सिंगनं म्हटलं आहे. 

विराट कोहली संघाचा कर्णधार झाल्यास आरसीबी किमान लढत देऊ शकते. विराट कोहली त्याच्या संघातील खेळाडूंना लढण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. विराट कोहलीला कॅप्टन करा ही टीम पुन्हा लढेल आणि जिंकेल, असं हरभजन सिंगनं स्टार स्पोर्टसशी बोलताना म्हटलं आहे.

विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये  322 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. 

विराट कोहलीनं 2013 ते 2021 च्या काळात आरसीबीची कर्णधारपद भूषवलं होतं. 2012 च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीचा उपकर्णधार होता.  फाफ डु प्लेसिस जखमी झाल्यानंतर विराटकडे पुन्हा एकदा आरसीबीचं कर्णधारपद आलं होतं. 

विराच कोहलीनं आरसीबीचं नेतृत्त्व 143 मॅचमध्ये केलं होतं. यामध्ये आरसीबीनं  66 मॅचमध्ये विजय मिळवला होता. तर 70 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 2021 च्या आयपीएलनंतर विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं. फाफ डु प्लेसिसनं आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 32 मॅचमध्ये नेतृत्त्व केलं होतं. यामध्ये 15 मॅचमध्ये आरसीबीनं विजय मिळवला तर  17 मॅचमध्ये आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला होता. 

आरसीबीचा मुंबईकडून पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील पाचवा पराभव होता. आरसीबीला आतापर्यंत आयपीएलमध्ये  एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

संबंधित बातम्या : 

Hardik Pandya: 'ड्रेसिंग रुममध्ये हार्दिक पांड्याच्या हूटिंगवर...', इशान किशनचं विधान; तोंडभरुन कौतुकही केलं

Suryakumar Yadav : आम्ही सर्वांनी एबी डीविलियर्सला पाहिलंय, सूर्यकुमार यादव त्यापेक्षा चांगला, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget