एक्स्प्लोर

CSK in IPL 2023 Playoff: धोनी IPL प्लेऑफ खेळणार? शेवटचा सामना हरुनही चेन्नई प्लेऑफमध्ये कशी पोहोचेल?

CSK in IPL 2023 Playoff: IPL 2023 च्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सह उर्वरित 7 संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

MS Dhoni, CSK in IPL 2023 Playoff: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम आता रंगतदार सामन्यांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करत आहे. गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यंदाच्या सीझनचा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असून प्लेऑफच्या शर्यतीतून ते आधीच बाहेर पडले आहेत. 

चेन्नई सुपर किंग्जसह (CSK) उर्वरित 7 संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल की, नाही हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. लाडक्या धोनीला आयपीएल 2023 ची ट्रॉफी उंचावताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आयपीएलमधील प्लेऑफच्या लढतींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. 

चेन्नईचा सामना दिल्लीसोबत 

आयपीएल 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये चेन्नई 15 गुणांसह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण शेवटी ही आयपीएलच्या प्लेऑफची लढत आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. चेन्नईचा साखळी सामन्यांतील शेवटचा सामना शिल्लक आहे. हा सामना 20 मे रोजी दिल्लीविरोधात असणार आहे. 

जर चेन्नईचा संघ हा सामना हरला तर पॉईंट टेबलमध्ये त्यांचे 15 गुणच राहतील. अशा परिस्थितीत धोनीच्या संघाला सर्वात मोठा धोका लखनौ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्याकडून असेल. याचं कारण म्हणजे, पॉईंट टेबलमध्ये लखनौचे 15 गुण असून मुंबईचे 14 गुण आहेत. या दोन्ही संघांना आता शेवटचा सामना वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी जर आपापले सामने जिंकले तर त्यांचे गुण चेन्नईपेक्षा जास्त होतील. 

दुसऱ्या क्रमांकावर असूनही चेन्नई प्लेऑफमधून कशी बाहेर जाईल? 

लखनौ आणि चेन्नई संघांनी आपापले सामने जिंकल्यास ते चेन्नईला मागे टाकून प्लेऑफसाठी पात्र ठरतील. यानंतर चेन्नई सर्वात मोठा धोका विराट कोहलीच्या बंगळुरू संघाकडून असेल, ज्यांच्याकडे सध्या 12 सामन्यांत 12 गुण आहेत. आरसीबीला अजून दोन सामने खेळायचे आहेत. जर RCB संघानं आपले दोन्ही सामने जिंकल्यास चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि बंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

चेन्नई त्यांचा शेवटचा सामना हरला, तसेच लखनौ, मुंबई आणि बंगळुरू संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर तिघेही प्लेऑफसाठी पात्र ठरतील. आणि चेन्नईचं आव्हान संपुष्टात येईल. 

सीएसकेला प्लेऑफ गाठायचं असेल तर काय करावं लागेल? 

चेन्नईला प्लेऑफ गाठायचं असेल तर मात्र शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र चेन्नई शेवटचा सामना हरलाच तर मात्र, प्लेऑफची वाट त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असेल. जर चेन्नई शेवटचा सामना हरली, तर मग प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईकडे दुसरा मार्ग कोणता? 

याचं साधं उत्तर असं आहे की, शेवटचा सामना गमावल्यानंतरही चेन्नई, लखनौ आणि मुंबई यांच्यापैकी एकानंही त्यांचा शेवटचा सामना गमावला, तर मात्र चेन्नईसाठी प्लेऑफ गाठणं शक्य आहे. दोघांनी आपापले सामने जिंकल्यास सर्वांच्या नजरा आरसीबीवर असतील. 

बंगळुरूनं उरलेल्या 2 पैकी एकही सामना गमावला तर चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तर, लखनौचा शेवटचा सामना 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबत खेळायचा आहे. मुंबईला 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. चेन्नईचा संघ 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. तसेच, बंगळुरू संघाला 18 मे रोजी हैदराबादविरुद्ध 13वा सामना खेळायचा आहे. तर शेवटचा सामना 21 मे रोजी गुजरातविरुद्ध होणार आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PMC election 2026: पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चुरशीची लढाई, विरोधक रणनीती आखण्यात गुंतले, भाजपची प्रचारात आघाडी
पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चुरशीची लढाई, विरोधक रणनीती आखण्यात गुंतले, भाजपची प्रचारात आघाडी
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PMC election 2026: पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चुरशीची लढाई, विरोधक रणनीती आखण्यात गुंतले, भाजपची प्रचारात आघाडी
पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चुरशीची लढाई, विरोधक रणनीती आखण्यात गुंतले, भाजपची प्रचारात आघाडी
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Embed widget