एक्स्प्लोर

मुंबई की दिल्ली? आयपीएलच्या फायनलचं तिकीट कुणाला?

आयपीएल प्ले ऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा सामना होणार आहे तो दुसऱ्या स्थानावरच्या दिल्ली कॅपिटल्सशी. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उद्या संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

IPL 2020 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या सुपर परफॉर्मन्सनं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. त्यामुळे आयपीएल प्ले ऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा सामना होणार आहे तो दुसऱ्या स्थानावरच्या दिल्ली कॅपिटल्सशी. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उद्या संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

मुंबईची 'पलटन' सर्वांवर भारी

आयपीएलच्या तेराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवानं झाली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिल्याच सामन्यात मुंबई हरली. पण त्यानंतर रोहित शर्माच्या या फौजेनं प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत पुढच्या तेरा सामन्यांपैकी 9 सामने सहज जिंकले. मुंबई 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर राहिली. त्यामुळे क्वालिफायर वनमध्ये खेळण्याचा मान मुंबईला मिळाला.

चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सनं यंदाही लौकीकाला साजेशी कामगिरी बजावली. त्यात सलामीच्या क्विंटन डी कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांची फलंदाजीच्या आघाडीवरची भूमिका महत्वाची ठरली. डी कॉकनं यंदाच्या मोसमात मुंबईकडून आतापर्यंत सर्वाधिक 443 धावा फटकावल्या आहे. त्यापाठोपाठ ईशान किशननं 428 तर सूर्यकुमारच्या खात्यातही 410 धावा जमा आहेत. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या यांनीही अनेक सामन्यांमध्ये फलंदाजीत मोलाचं योगदान दिलंय.

मुंबईच्या गोलंदाजांचा तोफखानाही यंदा आग ओकतोय. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा, जेम्स पॅटिन्सन, कुल्टर नाईल यांच्या साथीला दीपक चहर आणि कृणाल पंड्याची फिरकीही प्रभावी ठरतेय. 'पर्पल कॅप'च्या शर्यतीतही बुमरा आणि बोल्ट आघाडीवर आहेत. त्यामुळे क्वालिफायर सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्वाची ठरणार आहे.

दिल्लीची मदार कुणावर?

दिल्ली सलामीवीर शिखर धवनही चांगल्याच फॉर्मात आहे. धवननं 14 सामन्यात 2 शतकं आणि तीन अर्धशतकांसह आतापर्यंत 525 धावा ठोकल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो लोकेश राहुल आणि डेव्हिड वॉर्नरनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरनंही 14 सामन्यात 414 धावा केल्या आहेत. बंगलोरविरुद्धच्या निर्णायक सामन्यात अजिंक्य रहाणेलाही सूर सापडला. पण पृथ्वी शॉचा फॉर्म हा दिल्लीच्या दृष्टीनं चिंतेचा विषय ठरावा. चेन्नईविरुद्धची 63 धावांची खेळी वगळता पृथ्वी शॉची कामगिरी जेमतेमच म्हणावी लागले.

कगिसो रबाडा आणि एनरिच नॉत्ये या वेगवान आफ्रिकन जोडगोळीमुळे दिल्लीच्या आक्रमणाला चांगलीच धार आली आहे. पण प्ले ऑफच्या निर्णायक सामन्यांमध्ये दिल्लीच्या इतर गोलंदाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहिल.

'मुंबई'कर दिल्लीला तारणार?

दिल्लीच्या या संघात मुंबईकर खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे हे मूळचे मुंबईचे खेळाडू दिल्लीच्या संघात आहेत. आणि या मोसमात त्यांनी दिल्लीच्या आतापर्यंतच्या यशात मोठा हातभार लावला आहे?

रोहित शर्मा फिट

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून पूर्णपणे सावरलाय. तीन सामने विश्रांती घेतल्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत रोहित पुन्हा मैदानात उतरला. रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईची आघाडीची फळी आणखी मजबूत झाली आहे.

कुणाचं पारडं जड?

दिल्ली आणि मुंबई संघांमध्ये आजवर 26 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातल्या 14 सामन्यात मुंबईनं तर 12 सामन्यात दिल्लीनं विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात साखळीतल्या दोन लढतींमध्ये उभय संघांनी एकेक लढत जिंकली होती. त्यामुळे दुबईच्या मैदानात पहिल्या क्वालिफायरमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.

मुंबईनं याआधी पाच वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर दिल्लीला आजवर एकदाही अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलंय. त्यामुळे दुबईतली पहिली क्वालिफायर जिंकून दिल्ली पहिल्यांदाच फायनल गाठणार की मुंबई पाचव्या विजेतेपदाकडे कूच करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget