एक्स्प्लोर

रोमांचक सामन्यात अखेरच्या चेंडूवर विंडीजवर मात, भारताने मालिका 3-0 ने जिंकली

सलामीवीर शिखर धवन आणि रिषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजवर अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात गड्यांनी मात केली. या विजयासह भारताने ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका देखील खिशात घातली आहे.

चेन्नई: रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजवर शेवटच्या चेंडूवर 6 गड्यांनी विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवन आणि रिषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजवर अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 6 गड्यांनी मात केली.  या विजयासह भारताने ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका देखील खिशात घातली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि के. एल राहुल लवकर  बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि रिषभ पंतने विजयावर शिक्कामोर्तब केला. धवनने केवळ 62 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली तर रिषभ पंतने 38 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. विजयला 7 धावा बाकी असताना तो बाद झाला.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्माचा  रूपाने पहिला झटका बसला. रोहितला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर आलेल्या के. एल. राहुलने 4 चौकारांच्या मदतीने 17 धावांची खेळी केली. तो 17 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून किमो पॉलने 2 तर थॉमसने 1 गडी बाद केला. शिखर धवन आणि रिषभ पंतनं तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. धवनला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
अंतिम षटकात रोमांचक स्थिती 
फॅबिन अलेन च्या शेवटच्या षटकात 5  धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर धवनने 2  धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर  मनीष पांडेने एक धाव काढत पुन्हा धुरा धवनच्या हाती सोपवली. चौथ्या चेंडूवर एकही धाव  घेता आली नाही तर पाचव्या चेंडूवर धवन बाद झाला. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असताना मनीष पांडेने कशीबशी धाव पूर्ण केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.
विंडीजचे भारतासमोर 182 धावांचे लक्ष्य भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात विंडीजने भारतासमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या दहा षटकात निकोलस पूरन आणि डेरेन ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर विंडीजने आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.विंडीजने नाणेफेक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचे सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत 6  षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप 24 धावांवर तंबूत परतला. फटकेबाजीने डावाची सुरुवात करणारा हेटमायर 26 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र चहलने त्याचाही अडसरही दूर केला करत दुसरा बळी मिळवला. यानंतर आलेल्या अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने 15  चेंडूत 15 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले. ब्राव्हो आणि पूरनने शेवटच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली. पूरनने केवळ 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली तर ब्राव्होने 37 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. सर्व मालिकांवर भारतीय संघाचा दबदबा विंडीजच्या भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका होती. ही मालिका भारताने पहिलेच 2-0 ने जिंकली होती. यापूर्वी भारताने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली असून एकदिवसीय मालिका 3-1 ने खिशात घातली होती. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली असून त्यांच्या जागी भारताने युझवेन्द्र चहल, वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंना संधी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Embed widget