एक्स्प्लोर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० असं चारीमुंड्या चीत केलं होतं. त्याच श्रीलंकेशी मायदेशातल्या कसोटी मालिकेत खेळताना भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. पण क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी त्याला कमी लेखायचं नसतं, हे विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना लक्षात ठेवावं लागेल.

कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पहिल्या लढाईसाठी. उभय संघांमधलं हे युद्ध आहे तीन कसोटी सामन्यांचं. त्यातली पहिली लढाई कोलकात्यात, दुसरी लढाई नागपुरात तर तिसरी लढाई दिल्लीत रंगणार आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० असं चारीमुंड्या चीत केलं होतं. त्याच श्रीलंकेशी मायदेशातल्या कसोटी मालिकेत खेळताना भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. पण क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी त्याला कमी लेखायचं नसतं, हे विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना लक्षात ठेवावं लागेल. दिनेश चंडिमलच्या याच श्रीलंकेनं पाकिस्तानचा नुकताच २-० असा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानवरच्या त्या विजयानं श्रीलंकेलाही नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. त्यामुळं भारतीय संघाला आता आत्मविश्वास उंचावलेल्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे. ईडन गार्डन्सवरच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं टीम इंडिया तीन महिन्यांनी पाच दिवसांचं क्रिकेट खेळणार आहे. जुलै-ऑगस्टमधल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये विराटसेना तेरा वन डे आणि सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळली आहे. पण यंदाच्या मोसमातल्या रणजी सामन्यांचा अनुभव बहुतेक शिलेदारांच्या गाठीशी आहे. त्यामुळं पाच दिवसांच्या क्रिकेटशी जुळवून घेण्यात टीम इंडियाला अडचण येणार नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका संघ आजवर भारतात सतरा कसोटी सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. पण त्यापैकी एकही कसोटी श्रीलंकेला जिंकता आलेली नाही. भारतानं सतरापैकी दहा कसोटी सामने जिंकले असून, उभय संघांमधल्या सात कसोटी अनिर्णीत राहिल्या आहेत. दिनेश चंडिमलचा तुलनेत दुबळा संघ अपयशाची ती कोंडी फोडू शकेल का?, याविषयी जाणकारांच्या मनात शंका आहे. भारत दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेची मदार ही प्रामुख्यानं अष्टपैलू अँजलो मॅथ्यूज आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ यांच्यावरच अवलंबून आहे. पण केवळ त्या दोन शिलेदारांच्या जीवावर श्रीलंका संघ भारत दौऱ्यात मोठा चमत्कार घडवणं संभवत नाही. श्रीलंकेच्या दृष्टीनं ईडन गार्डन्सवर आशेची एकच बाब म्हणजे कोलकात्याच्या या कसोटीवर पहिले तीन दिवस पावसाचं सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं बुधवारी सकाळी कोलकात्यात पाऊस झाला. पुढच्या तीन दिवसांतही कोलकात्यात अधूनमधून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलकात्यातल्या हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांचा, तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. टीम इंडियाची ही आक्रमक रणनीती अर्थातच पावसावर आणि श्रीलंकेवरही विजय मिळवण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल असेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs RCB Live Score IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय
GT vs RCB IPL 2026 : गिल-बटलरच्या वादळापुढे 'आरसीबी' ढेर; गुजरातचा 4 विकेट्सने शानदार विजय
Rajat Patidar Catch Controversy Video : रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?
रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?
Harbhajan Singh News : आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?
आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?
Ayush Mhatre Majha Vision 2026 : वानखेडेवर सराव सुरू होता अन् अचानक माहीने जवळ बोलावलं...; आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, नेमकं काय घडलं?
वानखेडेवर सराव सुरू होता अन् अचानक माहीने जवळ बोलावलं...; आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
Embed widget