एक्स्प्लोर

IND vs SA 2nd TEST : टीम इंडियाने रचला इतिहास; कसोटीत पहिल्यांदाच मिळवला केपटाऊनच्या मैदानावर विजय

IND vs SA 2nd TEST : टीम इंडियाने या विजयासह नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये केपटाऊनच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले.

IND vs RSA 2nd Test : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या दीड दिवसात धुव्वा उडवत मालिका 1-1 बरोबरीत सोडवली आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज (Mohhammad Siraj) आणि जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) महत्त्वाचे योगदान राहिले. टीम इंडियाने या विजयासह नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये केपटाऊनच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. 

केपटाऊनमध्ये यापूर्वी भारताने 6 कसोटी सामने खेळले होते. त्यातील 4 सामन्यांत टीम इंडिया पराभूत झाली होती. दरम्यान, 3 तारखेपासून केपटाऊनमध्ये टीम इंडियाने 7 वा सामना खेळण्यास सुरुवात केली आणि इतिहास रचला. भारताचा हा कसोटीत केपटाऊनच्या मैदानातील पहिला विजय आहे. 

1993 मध्ये खेळला होता केपटाऊनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs RSA) केपटाऊनच्या मैदानावर 1993 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अर्निणयीत राहिला होता. यानंतर 1997 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, 2007 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला होता. तर 2011 मध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णयीत राहिला होता. यानंतर 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत झाली होती. आता पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने आले होते. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. 

सामन्यातील टीम इंडियाची कामगिरी 

भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले. सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या डावात 98 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसऱ्या डावात 176 धावा करता आल्या. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे टीम इंडियाने तीन गडी गमावून सहज गाठले.

दुसऱ्याच दिवशी भारताने दुसरी कसोटी जिंकली. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावा करू शकला. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात अ‍ॅडम मार्करमच्या शतकाच्या जोरावर यजमान संघाने 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन विकेट्स गमावून जिंकली.

इतर महत्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd Test : 76 च्या बदल्यात 55! टीम इंडियानं तब्बल 16 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बदला घेतला; सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची सुद्धा नोंद

 

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
Embed widget